शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

संगीत ही आयुष्यभर शिकण्याची कला - श्रीकांत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:13 IST

पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक असते, असे मत संगीत विद्यालयाचे प्रमुख श्रीकांत देसाई यांनी व्यक्त केले.

गोपाळ गायन समाज संगीत विद्यालयाचा १०० वर्षे संगीताच्या शिक्षणाचा यज्ञ अविरतपणे सुरू आहे. गोविंदराव देसाई यांनी विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. संगीताचा पाया भक्कम करण्याचे काम संगीत विद्यालयाने केले. पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक असते, असे मत संगीत विद्यालयाचे प्रमुख श्रीकांत देसाई यांनी व्यक्त केले.गोपाळ गायन समाज संगीत विद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ६० पानांच्या या स्मरणिकेमध्ये संगीत विद्यालयाचा प्रवास, वाटचाल, इतिहास, माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनोगतपर लेख आदींचा समावेश असेल. ‘स्वरानुबंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन २ जुलै रोजी महापौर मुक्ता टिळक आणि गायक पंडित डॉ. अजय पोहनकर यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती संस्थेचे प्रमुख आणि विश्वस्त श्रीकांत देसाई यांनी दिली.एक जुलै रोजी गोपाळ गायन समाज संगीत विद्यालयाला १०० वर्षे पूर्ण होत असून, विद्यालय १०१व्या वर्षात पदार्पण करील. १ जुलै १९१८ रोजी गुरुवर्य गोविंदराव देसाई यांनी वाड्यातील एका खोलीमध्ये गोपाळ गायन समाज संगीत विद्यालय सुरू केले. सहा-सात वर्षांनी लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर यांच्या साह्याने गोविंदराव देसाई यांना टिळक स्मारक मंदिराजवळ छोटी जागा मिळाली. १९२६मध्ये इमारतीचे काम सुरू झाले. दोन एप्रिल १९२७ रोजी गोविंदराव देसाई यांचे गुरू विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या गायनाची मैफल रंगली आणि इमारतीचे उद्घाटन झाले. तेव्हापासून १०० वर्षे संगीताच्या शिक्षणाचा यज्ञ अविरतपणे सुरू आहे. संगीताच्या पाया भक्कम करण्याचे काम संगीत विद्यालयाने केले. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी येथे संगीताचे धडे गिरवले. २० मे हा गोविंदराव देसाई यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या सहा शिष्यांनी गायनातून गुरूंना मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थिनी ७० वर्षे वयोगटातील होत्या. सर्वांत वृद्ध विद्यार्थिनी असलेल्या आजी ९३ वर्षांच्या आहेत. गोविंदराव देसार्इंनी शिकविलेल्या चीजा इतक्या वर्षांनंतरही त्यांनी जशाच्या तशा सादर केल्या.पूर्वीची संगीत शिक्षणाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. ताल, सूर, लय पक्के झाले पाहिजेत, असा दंडक असायचा. संगीत हे केवळ शिक्षण न उरता ती साधना व्हायची. दररोज नियमितपणे गुरू-शिष्यांचा संवाद, अध्ययन-अध्यापन होत असे. विद्यार्थी एकाग्रतेने आणि संयमाने संगीत शिक्षणाकडे पाहत असत. त्या वेळचे शिक्षकही कडक शिस्तीचे होते. आता संगीताचे क्लास आठवड्यातून एकदा-दोनदा होतात. विद्यार्थ्यांमधील प्रामाणिकपणा, झोकून देण्याची तयारी, संयम, कष्ट करण्याची तयारी कमी झाल्यासारखे वाटते. कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. सुरुवातीपासूनच आपल्याला हे जमेल की नाही, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असते. सुरुवातीला काहीसे प्रयत्न केले जातात. शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच आहे. करिअर म्हणून संगीतक्षेत्राकडे पाहिले जाते की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. कला साध्य करणे हे स्वत:वर अवलंबून असते. जिद्दीने शिकण्याची तयारी आणि साधनेला संगीतक्षेत्रात पर्याय नाही. त्यामुळेच ही कला जिद्दीने आणि संयमाने आत्मसात करणे आवश्यक आहे. सध्याच्या पिढीसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत; त्यामुळे त्यांचे आयुष्यही वेगवान झाले आहे. अशा वेळी सलग १०-१२ वर्षे संगीत साधना करण्याचा संयम कितपत टिकू शकतो, हे पाहावे लागते. किमान १० वर्षे शिकल्यावर संगीतातील मूलभूत गोष्टींचे ज्ञान अवगत होते. संगीत ही आयुष्यभर शिकावी लागणारी कला आहे. बदलत्या काळात विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम बदलल्याने त्यांच्यामध्ये संयम राहिलेला नाही. साधनेपेक्षा सादरीकरण, मंचावरील कार्यक्रम यांवर भर दिला जातो. मुलांमध्ये रिअ‍ॅलिटी शोचे आकर्षण वाढले आहे. या बदलत्या काळात पालकांनीही संयम राखणे आवश्यक आहे. त्यांचीही मानसिकता बदलायला हवी. तरच, संगीताचा आत्मिक आनंद घेता येईल.

टॅग्स :musicसंगीतPuneपुणे