शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

थोडक्यात हुकलेली संधी अखेर गवसली

By admin | Updated: June 2, 2017 02:30 IST

यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत धडक मारली; मात्र अवघ्या काही गुणांनी आशिष पाटील यांची आयएएस अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत धडक मारली; मात्र अवघ्या काही गुणांनी आशिष पाटील यांची आयएएस अधिकारी बनण्याची संधी हुकली होती. त्यानंतर इंडियन बँकेच्या आॅफिसर पदासाठी निवड झाली; मात्र पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी करायची की बँकेत नोकरी स्वीकारायची याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. अखेर पुन्हा यूपीएससी परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला अन् गेल्या वर्षी अवघ्या काही गुणांनी हुकलेली संधी पाटील यांना गवसली.यूपीएससी परीक्षेत आशिष पाटील याला ३३०वी रँक मिळाली आहे. आशिष मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आहेत. त्यांच्या वडिलांचा वेल्डिंगचा वर्कशॉप आहे, तर आई गृहिणी आहे. बारावीनंतर आशिषने पुण्यातून इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केले. गेल्या ३ वर्षांपासून तो यूपीएससीची तयारी करीत होता. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात त्याला यश आले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात थेट मुलाखत दिली होती; मात्र अवघ्या काही गुणांनी त्याचे आयएएस व्हायचे स्वप्न भंगले होते. नाशिक येथील प्री-आयएएस सेंटरमध्ये त्याने एक वर्ष यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यानंतर पुण्याजवळील नऱ्हे गाव येथे रूम घेऊन पूर्णवेळ स्वयंअध्ययन करण्यावर भर दिला. अखेर २०१६-१७ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने यशाला गवसणी घातली.यशामध्ये आईचा वाटा मोठाआशिष यांच्या आईचे शिक्षण एम.ए.बी.एड.पर्यंत झाले आहे; मात्र त्यांनी नोकरी न करता पूर्णवेळ घराकडे लक्ष दिले. लहानपणापासून आशिषच्या अभ्यासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. या यशामध्ये आईचा मोठा वाटा असल्याचे आशिषने सांगितले.