शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 20:50 IST

हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते.

मंचर: गावडेवाडी (ता आंबेगाव) येथील माथावस्ती परिसरात विहिरीत तोल गेल्याने एक जण बुडाला असून त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. कृष्णा सखाराम शेळके (वय १८, मूळ रा. परभणी) असे विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील माथावस्ती परिसरात कृष्णा हा शुक्रवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास विहिरीत तोल जाऊन पडला आहे. हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बाहेरच आंघोळ करत होता. मात्र तोल जाऊन तो विहिरीत पडला. त्याच्या समवेत एक लहान मुलगी होती. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून संबंधित मुलाचे वडील मदतीसाठी धावून आले. वडिलांनाही नीट पोहता येत नव्हते. मात्र मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी धाडसाने विहिरीत उडी घेतली. दुर्देवाने त्यांना मुलाला वाचवता आले नाही. मोटारीच्या पट्ट्याला धरून वडिलांनी तग धरला. मात्र कृष्णा हा तरुण विहिरीच्या पाण्यात बुडाला.  विहिरीत पन्नास फूट खोल पाणी असल्याने त्याला शोधण्यासाठी अडचण येत होती. पोहणाऱ्याच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. शेवटी मंचर पोलिसांनी विहिरीच्या पाण्यात कॅमेरा 50 फूट खोल पाण्यात टाकून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण पाण्यात अडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंचर पोलिसांनी एनडीआरएफला पाचारण केलेले आहे.अद्यापपर्यंत ही टीम या ठिकाणी आली नसून या परिसरातील नागरिक एनडीआरएफची वाट पाहत आहे. शुक्रवारी तालुक्यात तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे