शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आदिवासी समाजाचा जनसागर शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 14:53 IST

आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.

आनंद कांबळे /जुन्नर दि.4 - आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. आदिवासी विचारमंच व संलग्न संघटनेच्या वतीने आयोजित अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.योजनाताई वाजे या होत्या. भारत देशात आदिवासी  समाजावर अन्याय होत आहेत. बळजबरीने आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. आदिवासी  समाज या देशाचा मूळ समाज असून त्याची भाषा ही देशाची भाषा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे.  सन १६५० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर कोळो महादेव व ठाकर समाजाच्या १६०० वीर पुरुषांनी उठाव केला, सरनाईक खेमा व त्याच्या सहकारी यांनी स्वराज्याच्यासाठी बलिदान दिले. या बलिदानाची आठवण म्हणून आपण आज एकत्र आलो आहोत. समाजासाठी सर्वानी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे.असेही यावेळी पेंदाम यांनी मत व्यक्त केले.जुन्नर-शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या आदिवासी विरांची कमी नव्हती. एक लढवय्या जमात म्हणून आदिवासी पुढे असायचे ,मात्र इतिहासकारांनी या जमातीला प्रसिद्धीपासून दूर ठेऊन त्यांची उपेक्षाच केली. निजमशाहीच्या ताब्यात असलेल्या शिवनेरी किल्यावर त्या वेळचा सरदार रणदुल्ला खान याने स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूर आदिवासी जमातींना जरब बसावी म्हणून या भागातील शूर वीरांना पकडून 1600 आदिवासी शूर विरांची कत्तल करण्यात आली. पण अशा जरबेला घाबरेल तो आदिवासी कसला? या शूर विरांच्या अभिवादनासाठी  (रविवारी 3सप्टेबर ) रोजी स्मारकाजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रचंड जनसमुदायाने एकत्र आले होते. महाराष्ट्र राज्य आदिवासी विचार मंच व त्यांच्याशी सलग्न असणाऱ्या महाराष्ट्रातील  विविध आदिवासी संगटना सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी जुन्नर शहरातुन महाराष्ट्रातील तमाम आदिवासी उपस्तित बांधवानी रॅलीने शिवनेरीवरील कोळी चबुत-याला अभिवादन करण्यात आले.