शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आदिवासी समाजाचा जनसागर शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 14:53 IST

आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.

आनंद कांबळे /जुन्नर दि.4 - आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. आदिवासी विचारमंच व संलग्न संघटनेच्या वतीने आयोजित अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.योजनाताई वाजे या होत्या. भारत देशात आदिवासी  समाजावर अन्याय होत आहेत. बळजबरीने आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. आदिवासी  समाज या देशाचा मूळ समाज असून त्याची भाषा ही देशाची भाषा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे.  सन १६५० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर कोळो महादेव व ठाकर समाजाच्या १६०० वीर पुरुषांनी उठाव केला, सरनाईक खेमा व त्याच्या सहकारी यांनी स्वराज्याच्यासाठी बलिदान दिले. या बलिदानाची आठवण म्हणून आपण आज एकत्र आलो आहोत. समाजासाठी सर्वानी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे.असेही यावेळी पेंदाम यांनी मत व्यक्त केले.जुन्नर-शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या आदिवासी विरांची कमी नव्हती. एक लढवय्या जमात म्हणून आदिवासी पुढे असायचे ,मात्र इतिहासकारांनी या जमातीला प्रसिद्धीपासून दूर ठेऊन त्यांची उपेक्षाच केली. निजमशाहीच्या ताब्यात असलेल्या शिवनेरी किल्यावर त्या वेळचा सरदार रणदुल्ला खान याने स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूर आदिवासी जमातींना जरब बसावी म्हणून या भागातील शूर वीरांना पकडून 1600 आदिवासी शूर विरांची कत्तल करण्यात आली. पण अशा जरबेला घाबरेल तो आदिवासी कसला? या शूर विरांच्या अभिवादनासाठी  (रविवारी 3सप्टेबर ) रोजी स्मारकाजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रचंड जनसमुदायाने एकत्र आले होते. महाराष्ट्र राज्य आदिवासी विचार मंच व त्यांच्याशी सलग्न असणाऱ्या महाराष्ट्रातील  विविध आदिवासी संगटना सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी जुन्नर शहरातुन महाराष्ट्रातील तमाम आदिवासी उपस्तित बांधवानी रॅलीने शिवनेरीवरील कोळी चबुत-याला अभिवादन करण्यात आले.