शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

शिरूरचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

By admin | Updated: April 19, 2016 01:07 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाणी आल्याने शहराचा पाणीपुरवठा आज सुरळीत करण्यात आला. पुन्हा समस्या निर्माण होऊ नये म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाणी आल्याने शहराचा पाणीपुरवठा आज सुरळीत करण्यात आला. पुन्हा समस्या निर्माण होऊ नये म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. टंचाईच्या काळात नागरिकांची, तसेच विविध पक्ष व नेत्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगर परिषद या सर्वांची आभारी असल्याचेही लोळगे म्हणाल्या.बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने आठवडाभरापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. बंधारा कोरडा पडला होता. मात्र, वरील बंधारे पाण्याने भरले होते. या बंधाऱ्याचे ढापे काढून पाणी खाली आणण्यासाठी गेली अठवडाभर नगर परिषदेने प्रयत्न केले. अखेर पाणी काल रात्री बंधाऱ्यात पोहोचले. दरम्यानच्या काळात आमदार बाबूराव पाचर्णे यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे लोळगे यांनी सांगितले. माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, घोडगंगा सहकारी, तसेच व्यंकटेश साखर कारखान्यातर्फे शहरात दहा पाण्याचे टँकर पुरवल्याबद्दल लोळगे यांनी त्यांचेही आभार मानले. पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, भाजपाचे शहरप्रमुख केशव लोखंडे, समता परिषदेचे किरण बनकर, तसेच शरद परदेशी यांचेही पत्रकार परिषदेत आभार मानण्यात आले. सभापती जाकीरखान पठाण म्हणाले, गेली ८ दिवस पाणीपुरवठा विभागाने बंधाऱ्यात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. स्वच्छता आरोग्य समिती सभापती रवींद्र ढोबळे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख भगवान दळवी, आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे, पाणीपुरवठा विभागाचे लिंबाजी कोकरे, संजय कुंभार, अप्पा पोटघन यांनी यासाठी परिश्रम घेतले. मुख्याध्याधिकारी डॉ. विजय थोरात, अशोक पवार उपस्थित होेते.