शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

शिरूरमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर

By admin | Updated: February 18, 2017 02:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत

शिरूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत. २० उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे, तर दोन उमेदवारांनी शाळाच पाहिली नाही.यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती शिक्षणापेक्षा निवडून येण्याची क्षमता, घराणे व आर्थिक क्षमता या निकषांवर जास्तीतजास्त उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.लोकशाहीने निवडणूक लढवताना शिक्षणाची अट टाकली नाही. अट असती तर सर्वच पक्षांना पदवीधर, उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घ्यावा लागला असता. जि.प., पं. स. च्या तालुक्यातील अनुक्रमे ७ व १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी बऱ्याच कसरतीने उमेदवार निश्चित केले. किमान १५ ते २५ हजार मतदारांनी निवडून दिलेल्या सदस्याने या गटाचे, गणाचे प्रश्न नीटनेटकेपणे जिल्हा परिषद, पंचायत समितीत मांडून गट व गणाचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र सुशिक्षित सदस्य (किमान पदवीधर) असतील तर कारभार चालवताना निश्चितच सोपे जाईल, अशी सर्वसाधारण मतदारांची अपेक्षा असते. नाही तरी एकदा निवडून आल्यावर सदस्याचे पाच वर्षांत क्वचितच दर्शन होत असल्याने तो सुशिक्षित असला काय आणि नसला काय मतदारांना याचे काही घेणे देणे नसावे.या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असे प्रत्येकी एक उमेदवार हा ग्रॅज्युएट आहे. नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या उमेदवारांमध्ये चार भाजपा, तीन अपक्ष, तर एक काँग्रेसच्या उमेदवाराचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी १३ उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. यात पाच राष्ट्रवादी, दोन भाजपा, तीन शिवसेना, दोन काँग्रेस तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. पं.स.साठी सर्वाधिक पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. यात दहापैकी सहा पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. भाजपाचे तीन तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा यात समावेश आहे. जि. प. च्या राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार या पोस्ट पदवीधर आहेत. पं. स. ला राष्ट्रवादीचे दोन तर भाजपाचा एक उमेदवार पोस्ट पदवीधर आहे.शाळेची पायरीच न चढलेल्या उमेदवारांत एक उमेदवार भाजपाचा तर एक उमेदवार शिवसेनेचा आहे. उमेदवारांच्या शिक्षणाबाबतच्या या वास्तवामुळे आश्चर्याचे कारण नाही. कारण ग्रामीण भागातील या निवडणुकांत शिक्षण हा फारसा महत्त्वाचा मुद्दा नसतो. निवडून येण्याची क्षमता, त्या उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती आणि  पक्षाची ताकद याला जास्त  महत्त्व असते. (वार्ताहर)