शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये फक्त १५ उमेदवार पदवीधर

By admin | Updated: February 18, 2017 02:37 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत

शिरूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांमध्ये ६५ पैकी केवळ १५ उमेदवार हे पदवीधर आहेत. २० उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे, तर दोन उमेदवारांनी शाळाच पाहिली नाही.यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती शिक्षणापेक्षा निवडून येण्याची क्षमता, घराणे व आर्थिक क्षमता या निकषांवर जास्तीतजास्त उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.लोकशाहीने निवडणूक लढवताना शिक्षणाची अट टाकली नाही. अट असती तर सर्वच पक्षांना पदवीधर, उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घ्यावा लागला असता. जि.प., पं. स. च्या तालुक्यातील अनुक्रमे ७ व १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी बऱ्याच कसरतीने उमेदवार निश्चित केले. किमान १५ ते २५ हजार मतदारांनी निवडून दिलेल्या सदस्याने या गटाचे, गणाचे प्रश्न नीटनेटकेपणे जिल्हा परिषद, पंचायत समितीत मांडून गट व गणाचा विकास करणे अपेक्षित आहे. मात्र सुशिक्षित सदस्य (किमान पदवीधर) असतील तर कारभार चालवताना निश्चितच सोपे जाईल, अशी सर्वसाधारण मतदारांची अपेक्षा असते. नाही तरी एकदा निवडून आल्यावर सदस्याचे पाच वर्षांत क्वचितच दर्शन होत असल्याने तो सुशिक्षित असला काय आणि नसला काय मतदारांना याचे काही घेणे देणे नसावे.या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असे प्रत्येकी एक उमेदवार हा ग्रॅज्युएट आहे. नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या उमेदवारांमध्ये चार भाजपा, तीन अपक्ष, तर एक काँग्रेसच्या उमेदवाराचा समावेश आहे. पंचायत समितीसाठी १३ उमेदवारांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. यात पाच राष्ट्रवादी, दोन भाजपा, तीन शिवसेना, दोन काँग्रेस तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. पं.स.साठी सर्वाधिक पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. यात दहापैकी सहा पदवीधर उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत. भाजपाचे तीन तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा यात समावेश आहे. जि. प. च्या राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार या पोस्ट पदवीधर आहेत. पं. स. ला राष्ट्रवादीचे दोन तर भाजपाचा एक उमेदवार पोस्ट पदवीधर आहे.शाळेची पायरीच न चढलेल्या उमेदवारांत एक उमेदवार भाजपाचा तर एक उमेदवार शिवसेनेचा आहे. उमेदवारांच्या शिक्षणाबाबतच्या या वास्तवामुळे आश्चर्याचे कारण नाही. कारण ग्रामीण भागातील या निवडणुकांत शिक्षण हा फारसा महत्त्वाचा मुद्दा नसतो. निवडून येण्याची क्षमता, त्या उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती आणि  पक्षाची ताकद याला जास्त  महत्त्व असते. (वार्ताहर)