शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शिरूर लोकसभेसाठी वळसे-पाटील उमेदवार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:02 IST

शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.

शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.याच वेळी अ‍ॅड. अशोक पवार किंवा प्रदीप कंद यांपैकी एक शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असेल असेही सूचित केले. येथे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद असताना तसेच जनताही आपल्या सोबत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. याच वेळी उमेदवारीबाबत बोलताना वळसेपाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना वळसेपाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देतील व राष्ट्रवादीचा विजय होऊ शकेल, अशी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे मात्र आढळराव यांना पराभूत करू शकणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कोणाला पुढे करणार याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आता आहे. याबाबत पवार हे यावेळी फारच गंभीर असल्याच दिसून आले.शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर जि. प. चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही यासाठी प्रयत्नशील आहे. आजच्या सभेत अ‍ॅड. पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या समोर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच आहे. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला. यामुळे या दोघांपैकीएकाला शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पवार देणार हे मात्र नक्की झाले.शिरूर लोकसभा व शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना पक्षाचा पराभव होतो, याबद्दल पवार यांच्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाराजी व्यक्त केली. पराभव जनतेमुळे नाही तर व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे होतो, असेही त्यांनी सुनावले. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे असून लोकसभा व विधानसभेला कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी द्या, असा सल्लाही दिला. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू, असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्तात ठेवला.