शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर लोकसभेसाठी वळसे-पाटील उमेदवार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:02 IST

शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.

शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.याच वेळी अ‍ॅड. अशोक पवार किंवा प्रदीप कंद यांपैकी एक शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असेल असेही सूचित केले. येथे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद असताना तसेच जनताही आपल्या सोबत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. याच वेळी उमेदवारीबाबत बोलताना वळसेपाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना वळसेपाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देतील व राष्ट्रवादीचा विजय होऊ शकेल, अशी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे मात्र आढळराव यांना पराभूत करू शकणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कोणाला पुढे करणार याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आता आहे. याबाबत पवार हे यावेळी फारच गंभीर असल्याच दिसून आले.शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर जि. प. चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही यासाठी प्रयत्नशील आहे. आजच्या सभेत अ‍ॅड. पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या समोर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच आहे. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला. यामुळे या दोघांपैकीएकाला शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पवार देणार हे मात्र नक्की झाले.शिरूर लोकसभा व शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना पक्षाचा पराभव होतो, याबद्दल पवार यांच्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाराजी व्यक्त केली. पराभव जनतेमुळे नाही तर व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे होतो, असेही त्यांनी सुनावले. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे असून लोकसभा व विधानसभेला कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी द्या, असा सल्लाही दिला. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू, असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्तात ठेवला.