शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शिरूर लोकसभेसाठी वळसे-पाटील उमेदवार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:02 IST

शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.

शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.याच वेळी अ‍ॅड. अशोक पवार किंवा प्रदीप कंद यांपैकी एक शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असेल असेही सूचित केले. येथे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद असताना तसेच जनताही आपल्या सोबत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. याच वेळी उमेदवारीबाबत बोलताना वळसेपाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना वळसेपाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देतील व राष्ट्रवादीचा विजय होऊ शकेल, अशी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे मात्र आढळराव यांना पराभूत करू शकणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कोणाला पुढे करणार याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आता आहे. याबाबत पवार हे यावेळी फारच गंभीर असल्याच दिसून आले.शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर जि. प. चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही यासाठी प्रयत्नशील आहे. आजच्या सभेत अ‍ॅड. पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या समोर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच आहे. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला. यामुळे या दोघांपैकीएकाला शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पवार देणार हे मात्र नक्की झाले.शिरूर लोकसभा व शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना पक्षाचा पराभव होतो, याबद्दल पवार यांच्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाराजी व्यक्त केली. पराभव जनतेमुळे नाही तर व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे होतो, असेही त्यांनी सुनावले. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे असून लोकसभा व विधानसभेला कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी द्या, असा सल्लाही दिला. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू, असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्तात ठेवला.