शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे परिवाराच्या योगदानाची दखल नाही

By admin | Updated: January 28, 2017 00:17 IST

अतिशय दुर्गम भागातून आलेल्या शिंदे परिवाराने ग्रामिण जनता आणि शेतीशी कायम बांधिलकी जपली. रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण

पुणे: अतिशय दुर्गम भागातून आलेल्या शिंदे परिवाराने ग्रामिण जनता आणि शेतीशी कायम बांधिलकी जपली. रावसाहेब शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत आणि आण्णासाहेबांनी कृषीक्षेत्रातील योगदाना मार्फत ग्रामीण जनतेतील अस्मिता आणि आत्मसन्मान जागृत केला. पंरतु, कुटुंबाची शिक्षण, शेती, ग्रामिण अर्थव्यवस्था आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील योगदाना बाबत हवी त्या प्रमाणात नोंद घेतली गेली नसल्याची खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि विचारवंत स्व. रावसाहेब शिंदे यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांचे पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होेते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी. डी. पाटील, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉ. संदीप वासलेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे प्रमुख पाहुणे होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष मनोहर कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांना, साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांना, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला. रावसाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होऊन जीवनात वेगळी पायवाट निवडणाऱ्या डॉ. बाळासाहेब शेंडगे आणि रविंद्र डोमाळे या दोघांचा कार्यकर्ता पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.पवार म्हणाले , @@‘‘अण्णासाहेबांच्या निर्णयांमुळे ग्रामिण शेती अर्थव्यवस्था बळकट झाली. हरितक्रांतीत वैज्ञानिकांचे योगदान मोठे असते. त्यांनी लावलेले शोध आणि शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच हरितक्रांतीचे ध्येय साध्य झाले. परंतु या घटकांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका अण्णासाहेब आणि रावसाहेबांनी घेतली. रावसाहेबांना समाजातील चांगले लोक हेरून काढण्याचा जणु छंदच लागला होता. समाजातील चांगल्या, गुणी व्यक्ती हेरायच्या आणि त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवायचा हा रावसाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा महत्त्वाचा पैलू होता. राजकारणात रावसाहेबांना अनेक संधी उपलब्ध असताना, त्यांना त्याविषयी विचारणा होऊनही त्यांनी नम्रपणे त्यास नकार देत अण्णासाहेबांच्या मागे उभे राहण्याचे धोरण स्विकारले. ’’पुरस्कार्थी डॉ.अनिल काकोडकर, ना.धों. महानोर आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)