शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

प्रांतोप्रांतींचे क्रांतीकारक व्हाईसरायला मारणारा शूरवीर “शेर अली’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

अंदमानात अत्यंत कष्टप्रद शिक्षा भोगत असतानाही त्याच्या मनातली इंग्रजांविरुद्धची आग विझली नव्हती. खुल्या तुरुंगवासात कैद्यांकडून बेटांवरील बांधकामे, दगड फोडणे, ...

अंदमानात अत्यंत कष्टप्रद शिक्षा भोगत असतानाही त्याच्या मनातली इंग्रजांविरुद्धची आग विझली नव्हती. खुल्या तुरुंगवासात कैद्यांकडून बेटांवरील बांधकामे, दगड फोडणे, वृक्ष तोडणी वगैरेसारखी कामे करून घेतली जात. अशीच कामे करताना त्याने एखादे लोखंडी शस्त्र मिळवले असावे. योग्य संधीची तो वाट पाहत होता. ब्रिटीशांचा भारतातील सर्वोच्च अधिकारी म्हणजे व्हाइसराय. त्यावेळी व्हाईसराय असलेला लॉर्ड मेयो अंदमानला भेट द्यायला आला होता. चांगल्या वागणुकीमुळे सवलत मिळालेला शेर अली बेड्यांविना असावा. न्हाविकाम, अंदमानला येणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था अशी कामे त्याच्याकडे होती. अंदमानची पाहणी करुन परत जहाजाकडे निघालेल्या लॉर्ड मेयो यांच्यावर संधी साधून शेर अलीने अचानकपणे आपल्याकडील हत्याराने हल्ला केला. गंभीर जखमी झालेला लॉर्ड मेयो अंदमानातच मृत्यू पावला.

शेर अलीला अटक करुन लगेचच ८ फेब्रुवारी १८७२ या दिवशी वायपर बेटावर फाशी देण्यात आलं . भारताच्या व्हाईसरायचा वध होण्याची ही भारतीय इतिहासातील एकमेव घटना.

शेर अली च्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. पण इंग्रजांच्या सर्वोच्च अधिकार्‍याचा वध करणारा क्रांतिकारक म्हणून त्याचे नाव अमर झाले आहे. १८५७ नंतर इंग्रज सत्तेला हा बसलेला मोठा धक्काच होता.