शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

‘ती’ विहीरच कचऱ्याच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:00 IST

नगरपरिषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह : पाहणीत उघडकीस आले वास्तव

बारामती : नगरपालिका प्रशासन जळोची हद्दीतील गालिंदे यांच्या ज्या विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले, ती विहीरच कचºयाच्या विळख्यात व प्रचंड दुर्गंधी असलेल्या परिसरात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींचे बारामती येथील नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येते. यावर उपाय म्हणून बारामती नगरपालिकेने विसर्जन कुंड तयार करून या कुंडामध्येच गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शहरातील अनेक नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये मूर्तींचे विसर्जन केले. मात्र, कुंडामध्ये जमा झालेल्या या मूर्ती योग्य पद्धतीने विसर्जन करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर होती. पण, नगरपालिका प्रशासनाने या मूर्ती कचरा डेपोमध्ये नेल्या. या वेळी भाजपाचे पदाधिकारी व काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्ती भरलेल्या कचºयाच्या गाड्या अडविल्या. गणेशमूर्ती कचरा डेपोत आणलेल्या पाहिल्याने गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.यावर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी मंगळवारी (दि. २) पत्रकार परिषद घेतली, यामध्ये आरोपफेटाळत मुख्याधिकारी म्हणाले, सालाबादप्रमाणे जळोची येथील गालिंदे यांच्या वापरात नसलेल्या विहिरीमध्ये गालिंदे यांच्या परवानगीने गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे नियोजन केले होते, असे सांगितले. बारामती येथील माळावरच्या देवी परिसरात असलेल्या कचरा डेपो परिसरात ‘लोकमत’ने प्रत्यक्षपाहणी केली. यावेळी गालिंदे यांच्या वापरात नसलेल्या ज्या विहिरीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले होते. ती विहीरच कचºयाच्या विळख्यात आहे. या विहिरीचे पाणीदेखील काळे व शेवाळयुक्त आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीविहिरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. त्यामुळे या विहिरीत जरी गणेशमूर्ती विसर्जन केल्या तरी त्यांचे पावित्र्यही धोक्यात येणार आहे.नगरपालिकेकडून गालिंदे यांच्या विहिरीचा हवाला देऊन सारवासारव करण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेने विसर्जन कुंडामध्ये जमा झालेल्या गणेश मूर्तींच्या पावित्र्याला कोणताही धक्का न लागता विसर्जन करण्याची अपेक्षा होती.ज्या विहिरीमध्ये विसर्जन करण्याचे नियोजन करण्याचा घाट घातला गेला ती विहिरच जर कचºयाच्या आणि प्रचंड दुर्गंधीयुक्त ढिगाºयामध्ये असेल तर नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त होऊ लागला आहे.

टॅग्स :Puneपुणे