शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
Viral Video : वीटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
4
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
5
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
6
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
7
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
8
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
9
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
10
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
11
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
12
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
13
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
14
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
15
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
16
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
17
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
18
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
19
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
20
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

शरद पवारांनी उलगडला ‘सिंहासन’चा पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:42 IST

‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो.

पुणे : ‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. चित्रपटाच्या प्रभावी मांडणीसाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि निवासस्थान उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावर हे कसे अयोग्य असल्याची भलीमोठी नोट सामान्य प्रशासन विभागाने मला पाठवली. ती नोट नाकारून मुख्यमंत्री कार्यालय व निवासस्थान चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले. त्यातून अप्रतिम कलाकृती निर्माण झाली,अशी आठवण सांगत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नोट ‘ओव्हररूल्ड’ करण्यात माझा हातखंडा असल्याची मिस्किल टिप्पणी केली.ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथाली, अरुण साधू कुटुंबीय व मित्रमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, आशय फिल्म क्लब, एआरडी एंटरटेनमेंट यांच्या वतीने साधू यांच्या कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरूण साधू स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे पत्रकारितेच्या व्यवसायाशी संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी विद्यार्थ्यांसह संशोधकांना पाठ्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात पवार बोलत होते.याप्रसंगी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे, एआरडी एंटरटेनमेंटच्या अश्विनी दरेकर, ग्रंथालीचे दिनकर गांगल आदी उपस्थित होते. यावेळी बुट पॉलिश करुन शिक्षण घेणाºया दोन विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्यात आली. ‘झिपºया’ चित्रपटाचा विशेष खेळही दाखविण्यात आला.केतकर यांनी पाठ्यवृत्ती योजनेमागची संकल्पना स्पष्ट केली. साधू यांच्या स्मृती जपण्यासाठी वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित असलेल्या, विज्ञानापासून सामाजिक विषयांपर्यंत संशोधन करणाºया विद्यार्थी, पत्रकारांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल.>ते कोणत्याही चौकटीत बसणारे साहित्यिक नव्हतेमराठी साहित्याचा दर्जा सर्वोत्तम कसा राहील, यासाठी अरुण साधू नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांचे लिखाण वाचकांच्या अंत:करणाला भिडणारे होते. त्यांचे साहित्य आणि लिखाण इतर भाषांमध्येही गेले. छोट्याशा गावातून आलेले साधू मुंबईकर झाले आणि मुंबईच्या व्यथावेदनेतून आपल्यातील अस्वस्थतेला शब्दबद्ध केले, असेही पवार म्हणाले. ते म्हणाले, साधू यांनी मुंबईचे अस्वस्थ वास्तव, लोकलच्या परिसरात राहणाºया तरुणांची सुखदु:खं प्रभावीपणे मांडली. आपल्या लेखनातून मराठी साहित्याला उच्च दर्जा मिळवून दिला. ते कोणत्याही एका चौकटीत बसणारे साहित्यिक नव्हते.