शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, CAAवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 13:13 IST

'काही लाख नॉन मुस्लिम आलेले आहेत. त्यांची अवस्था चिंताजनक आहे.'

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देशातील सध्यस्थिती, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीबाबत भाष्य केले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता व्यक्त करत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचा विरोध आहे. त्याला आम्ही संसदेत विरोध केला, विरोधात मतदान केले. यामुळे देशाच्या गंभीर प्रश्नावरुन लक्ष बाजूला जात आहे. केंद्राने पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तान या तीन देशांच्याच विशिष्ट धर्मांच्या लोकांना नागरिकत्व देऊ केले आहे. गृहमंत्र्यांनी मांडताना घुसखोर शब्द वापरला आणि या तीनच देशांचा उल्लेख केला. एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे...- या प्रस्तावाला आमचा विरोध, मतदानही विरोधात केले.- सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता.- गंभीर प्रश्नांपासून मन वळवण्याची काळजी घेतली जात आहे.- गृहमंत्र्यांनी मांडताना घुसखोर शब्द वापरला. तीनच देशांचा उल्लेख केला. एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.- काही लाख नॉन मुस्लिम आलेले आहेत. त्यांची अवस्था चिंताजनक आहे.- श्रीलंकेतून तमिळ येतात त्याचा विचार का केला नाही, ते एका विशिष्ट धर्माचे आहेत असाही मुद्दा उपस्थित होतो.- दिल्लीत माझ्या घरात काम करणारे नेपाळी आहेत. 30वर्षांपासून काम करतात, राहतात. दिल्लीत असे काम करणारे मोठ्या प्रमाणात आहेत.- धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचे काम केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न- महाराष्ट्रात उद्रेक होईल असे वाटलं नव्हतं.- 8 राज्यांनी कायदा स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली.- 8 वे राज्य बिहार आहे, ते एनडीएचे प्रतिनिधी आहे.- आपल्या देशात केंद्राची जबाबदारी आहे की राज्य आणि केंद्र समनवयाने चालावे मात्र तशी केंद्राची इच्छा नाही- लेखक, विचारावंतांसारखे वैचारिक घटक आहेत, त्यांचीही तीव्र प्रतिक्रिया आहे.- नेव्ही चे माजी प्रमुख ऍडमिरल रामदास यांचाही विरोध. हा फ़क्त मायनोरिटीचा विरोध नाही.- देशाचा सांघिक ऐक्य असणाऱ्यांचा विरोध.- केंद्राचा कायदा राज्याला मानावा लागेल का यावर पवार म्हणाले की, आठ राज्यांचा विरोध आहे. पण केंद्र सरकार आठ राज्य बरखास्त होऊ शकते, अमित शहा असताना काहीही होऊ शकते.- चर्चा न करता सत्तेचा गैरवापर सुरू आहे. यापूर्वी असे प्रकार झाले तर पंतप्रधान इतर पक्षांच्या नेत्यांना बोलवून चर्चा करत असत. आता तसे काहीही होत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक