शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता, CAAवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 13:13 IST

'काही लाख नॉन मुस्लिम आलेले आहेत. त्यांची अवस्था चिंताजनक आहे.'

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन देशातील सध्यस्थिती, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीबाबत भाष्य केले. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता व्यक्त करत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचा विरोध आहे. त्याला आम्ही संसदेत विरोध केला, विरोधात मतदान केले. यामुळे देशाच्या गंभीर प्रश्नावरुन लक्ष बाजूला जात आहे. केंद्राने पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तान या तीन देशांच्याच विशिष्ट धर्मांच्या लोकांना नागरिकत्व देऊ केले आहे. गृहमंत्र्यांनी मांडताना घुसखोर शब्द वापरला आणि या तीनच देशांचा उल्लेख केला. एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे...- या प्रस्तावाला आमचा विरोध, मतदानही विरोधात केले.- सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता.- गंभीर प्रश्नांपासून मन वळवण्याची काळजी घेतली जात आहे.- गृहमंत्र्यांनी मांडताना घुसखोर शब्द वापरला. तीनच देशांचा उल्लेख केला. एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.- काही लाख नॉन मुस्लिम आलेले आहेत. त्यांची अवस्था चिंताजनक आहे.- श्रीलंकेतून तमिळ येतात त्याचा विचार का केला नाही, ते एका विशिष्ट धर्माचे आहेत असाही मुद्दा उपस्थित होतो.- दिल्लीत माझ्या घरात काम करणारे नेपाळी आहेत. 30वर्षांपासून काम करतात, राहतात. दिल्लीत असे काम करणारे मोठ्या प्रमाणात आहेत.- धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचे काम केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न- महाराष्ट्रात उद्रेक होईल असे वाटलं नव्हतं.- 8 राज्यांनी कायदा स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली.- 8 वे राज्य बिहार आहे, ते एनडीएचे प्रतिनिधी आहे.- आपल्या देशात केंद्राची जबाबदारी आहे की राज्य आणि केंद्र समनवयाने चालावे मात्र तशी केंद्राची इच्छा नाही- लेखक, विचारावंतांसारखे वैचारिक घटक आहेत, त्यांचीही तीव्र प्रतिक्रिया आहे.- नेव्ही चे माजी प्रमुख ऍडमिरल रामदास यांचाही विरोध. हा फ़क्त मायनोरिटीचा विरोध नाही.- देशाचा सांघिक ऐक्य असणाऱ्यांचा विरोध.- केंद्राचा कायदा राज्याला मानावा लागेल का यावर पवार म्हणाले की, आठ राज्यांचा विरोध आहे. पण केंद्र सरकार आठ राज्य बरखास्त होऊ शकते, अमित शहा असताना काहीही होऊ शकते.- चर्चा न करता सत्तेचा गैरवापर सुरू आहे. यापूर्वी असे प्रकार झाले तर पंतप्रधान इतर पक्षांच्या नेत्यांना बोलवून चर्चा करत असत. आता तसे काहीही होत नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक