शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

पुस्तकांच्या गावाला येणार 'आकार'; सातारा जिल्ह्यातील 'भिलार'चा करणार नियोजनबद्ध विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:15 IST

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ठरलेल्या भिलारचा विकास आता नियोजनबद्ध पद्धतीने केला जाणार आहे. या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले असल्याने पुस्तकांच्या गावाला आकार येणार आहे.

ठळक मुद्देआराखड्यामध्ये केला जाईल आवश्यक सर्व सोयीसुविधांचा विचारसंपूर्ण गावाचा तयार केला जाणार स्वतंत्र नकाशा

राजानंद मोरेपुणे : भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ठरलेल्या भिलारचा विकास आता नियोजनबद्ध पद्धतीने केला जाणार आहे. या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले असल्याने पुस्तकांच्या गावाला आकार येणार आहे. गावातील रस्ते, घरांची बांधणी, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह यांसह गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधांचा विचार या आराखड्यामध्ये केला जाईल.महाराष्ट्रात वाचनसंस्कृतीची नवी सुरुवात करण्याच्या उद्देशाने, स्ट्रॉबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या भिलारमध्ये भारतातील पहिले पुस्तकांचे गाव साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीच्या जवळ असलेल्या या गावाला आता नवी ओळख मिळाली आहे. या पुस्तकांच्या गावात घरे आणि सार्वजनिक जागा अशा निवडक २५ ठिकाणी सुमारे १५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाचनाचा आनंद लुटता यावा आणि साहित्यविश्वाची सफर घडावी, यासाठी भिलार गावात सार्वजनिक वाचनालयाची चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी भिलारला नियोजनबद्ध आकार दिला जाईल.भिलारमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. याची जबाबदारी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नगररचना विभागाचे समन्वयक डॉ. प्रताप रावळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गावामध्ये येणारा प्रमुख रस्ता खूपच छोटा आहे. या रस्त्याची रुंदी सात ते साडेसात फुटांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. तसेच अंतर्गत रस्ते, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृहे, गटार व्यवस्था, गावातील सुशोभीकरण, पाण्याचा निचरा, निवासाची व्यवस्था यांसह विविध बाबींचा विचार आराखड्यात केला जाणार आहे. गावात आल्यानंतर पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. त्यासाठी कोणतेही अडथळे येऊ नयेत, अशी भूमिका आहे. 

बंधने घरांच्या बांधकामावरही भिलार गावातील घरांची बांधकामे करताना यापूर्वी कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे यापुढील काळात होणाऱ्या बांधकामांवर काही बंधने आणली जाऊ शकतात. ही घरे निसर्गपूरक असतील. त्यासाठी आराखडा तयार करताना नियमावलीही तयार केली जाऊ शकते. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रांमपचायतीवर राहील.

सध्या भिलार गावाचा केवळ ब्रिटिशकालीन नकाशा उपलब्ध आहे. मात्र, त्यामध्येही केवळ सर्व्हे नंबर असून त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे संपूर्ण गावाचा स्वतंत्र नकाशा तयार केला जाणार आहे. त्यानुसार रस्ते, इमारतींचे बांधकाम तसेच इतर सोयीसुविधांचा शास्त्रीय आराखडा तयार करून शासनाला सादर केला जाईल. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आराखड्यात मांडणी केली जाईल.- डॉ. प्रताप रावळ, समन्वयक, नगररचना विभाग, सीओईपी 

टॅग्स :Puneपुणे