शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

रासायनिक कारखान्यांचा सावळागोंधळ सुरूच!, सांडपाणी आले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:46 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या जनआक्रोशानंतर सामायिक प्रक्रिया केंद्राने रासायनिक सांडपाणी घेण्यास मनाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या जनआक्रोशानंतर सामायिक प्रक्रिया केंद्राने रासायनिक सांडपाणी घेण्यास मनाई केली. परिणामी काही कारखान्यांमधील प्रक्रिया अजून सुरू असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले असून ज्या चाºयांमधून सांडपाणी वाहून या केंद्रात येत होते त्या चाºया मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागल्याने सांडपाणी सर्वत्र पसरले आहे. मात्र हे पाणी कोणत्या कंपनीचे आहे, हे सांगणे सध्या तरी शक्य नाही.कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे याबाबत जनप्रक्षोभ पसरल्यामुळे संबंधित यंत्रणा जोराने कामाला लागलेली आहे. चोहोबाजूंनी वाटा बंद झाल्या असल्या तरी काही कारखाने अद्याप खोडसाळपणा करण्यातून बाहेर आलेले नाही व सांडपाणी सर्रासपणे सोडून देत आहेत. मात्र ज्या नलिकेतून हे पाणी येते ती एकत्रित असल्याकारणाने नक्की पाणी सोडतंय तरी कोण हे तपासाने निष्पन्न होणार आहे, मात्र ज्या विभागाकडे हे सोपवण्यात आले आहे, ते प्रदूषण नियंत्रण मंडळ अजून तरी कुरकुंभमध्ये दाखल झालेले नाही. त्यामुळे यावर पुढील कारवाई होईपर्यंत ग्रामस्थांमध्येदेखील संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, प्रदूषण मंडळाचे अधिकारी कुरकुंभकडे का फिरकले नाहीत, याचे कारण सध्या गुलदस्त्यातचआहे, मात्र कुरकुंभच्या ग्रामस्थांना सर्वच यंत्रणा विरोधात व्यापक मोहीम राबवणे आवश्यक झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीला कानाच्या आड घेण्याचे काम सध्या ही यंत्रणा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे, त्यामुळे अवघ्या काही दिवसांनी होणाºया बैठकीत काय होणार, हे पाहणे गरजेचे आहे.या जनआक्रोश मोर्चामध्ये कुरकुंभ येथील बरेच तरुण सहभागी झाले होते, मात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कारभारी फिरकले नाही. त्यामुळे त्यांना विचारणा केली असता काही कंपनी विरोधातच मोर्चा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी पुढील काळात फक्त काही मोजक्याच कंपनीला विरोध करून जमणार नाही, तर ज्या कंपनीतून प्रदूषणाबाबत काहीच उपाययोजना करत नाही त्यांना विरोध करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . दिवाळीच्या तोंडावर अधिकाºयांची तारांबळ कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्व कंपनीमार्फत शासकीय अधिकाºयांना दिवाळी पाकीट देण्याची प्रथा जणू पारंपरिकरीत्या येत राहिली आहे, मात्र या दिवाळीच्या सुरुवातीलाच जनआक्रोश झाल्याने या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यादरम्यान कुरकुंभमध्ये एकही अधिकारी आला नाही. परिणामी त्यांना आता गुपचूपपणे दिवाळी पाकीट पोहोचवावे लागणार असल्याची खात्रीशीर माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कंपनीच्या अधिकाºयामार्फत मिळाली आहे.तो ग्रामस्थ कोण?कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रासाठी प्रदूषण मंडळाचे जे अधिकारी नियुक्त केले आहेत ते या ठिकाणी आल्यावर त्यांच्यासोबत कुरकुंभ व पांढरेवाडी येथील एक ग्रामस्थ असतो. विविध कंपनीला भेट देताना हा ग्रामस्थ नेहमीच असल्यामुळे याचे व अधिकाºयांचे काय लागेबांधे आहेत, हेदेखील एक रहस्य आहे. हा अधिकारी परस्पर त्याला घेऊन सरकारी कामात त्याचा काय उपयोग करून घेतो हादेखील चर्चेचा विषय झाला आहे.आंदोलनाचा गैरफायदा नकोकुरकुंभ येथील जनआक्रोश झाला आहे. मात्र या आक्रोशामधून कुणाचाही आर्थिक फायदा होऊ न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. कुठल्याही स्थितीत या आंदोलनाच्या माध्यमातून दलाल निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची चर्चा सुरू आहे. काही ग्रामस्थ व स्थानिक नेते या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन कंपनी प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही घाबरू नका आम्ही आहे, असे सांगून मलई खातात.