शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रासायनिक कारखान्यांचा सावळागोंधळ सुरूच!, सांडपाणी आले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:46 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या जनआक्रोशानंतर सामायिक प्रक्रिया केंद्राने रासायनिक सांडपाणी घेण्यास मनाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेल्या जनआक्रोशानंतर सामायिक प्रक्रिया केंद्राने रासायनिक सांडपाणी घेण्यास मनाई केली. परिणामी काही कारखान्यांमधील प्रक्रिया अजून सुरू असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले असून ज्या चाºयांमधून सांडपाणी वाहून या केंद्रात येत होते त्या चाºया मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागल्याने सांडपाणी सर्वत्र पसरले आहे. मात्र हे पाणी कोणत्या कंपनीचे आहे, हे सांगणे सध्या तरी शक्य नाही.कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे याबाबत जनप्रक्षोभ पसरल्यामुळे संबंधित यंत्रणा जोराने कामाला लागलेली आहे. चोहोबाजूंनी वाटा बंद झाल्या असल्या तरी काही कारखाने अद्याप खोडसाळपणा करण्यातून बाहेर आलेले नाही व सांडपाणी सर्रासपणे सोडून देत आहेत. मात्र ज्या नलिकेतून हे पाणी येते ती एकत्रित असल्याकारणाने नक्की पाणी सोडतंय तरी कोण हे तपासाने निष्पन्न होणार आहे, मात्र ज्या विभागाकडे हे सोपवण्यात आले आहे, ते प्रदूषण नियंत्रण मंडळ अजून तरी कुरकुंभमध्ये दाखल झालेले नाही. त्यामुळे यावर पुढील कारवाई होईपर्यंत ग्रामस्थांमध्येदेखील संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, प्रदूषण मंडळाचे अधिकारी कुरकुंभकडे का फिरकले नाहीत, याचे कारण सध्या गुलदस्त्यातचआहे, मात्र कुरकुंभच्या ग्रामस्थांना सर्वच यंत्रणा विरोधात व्यापक मोहीम राबवणे आवश्यक झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीला कानाच्या आड घेण्याचे काम सध्या ही यंत्रणा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे, त्यामुळे अवघ्या काही दिवसांनी होणाºया बैठकीत काय होणार, हे पाहणे गरजेचे आहे.या जनआक्रोश मोर्चामध्ये कुरकुंभ येथील बरेच तरुण सहभागी झाले होते, मात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कारभारी फिरकले नाही. त्यामुळे त्यांना विचारणा केली असता काही कंपनी विरोधातच मोर्चा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी पुढील काळात फक्त काही मोजक्याच कंपनीला विरोध करून जमणार नाही, तर ज्या कंपनीतून प्रदूषणाबाबत काहीच उपाययोजना करत नाही त्यांना विरोध करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . दिवाळीच्या तोंडावर अधिकाºयांची तारांबळ कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्व कंपनीमार्फत शासकीय अधिकाºयांना दिवाळी पाकीट देण्याची प्रथा जणू पारंपरिकरीत्या येत राहिली आहे, मात्र या दिवाळीच्या सुरुवातीलाच जनआक्रोश झाल्याने या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यादरम्यान कुरकुंभमध्ये एकही अधिकारी आला नाही. परिणामी त्यांना आता गुपचूपपणे दिवाळी पाकीट पोहोचवावे लागणार असल्याची खात्रीशीर माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कंपनीच्या अधिकाºयामार्फत मिळाली आहे.तो ग्रामस्थ कोण?कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रासाठी प्रदूषण मंडळाचे जे अधिकारी नियुक्त केले आहेत ते या ठिकाणी आल्यावर त्यांच्यासोबत कुरकुंभ व पांढरेवाडी येथील एक ग्रामस्थ असतो. विविध कंपनीला भेट देताना हा ग्रामस्थ नेहमीच असल्यामुळे याचे व अधिकाºयांचे काय लागेबांधे आहेत, हेदेखील एक रहस्य आहे. हा अधिकारी परस्पर त्याला घेऊन सरकारी कामात त्याचा काय उपयोग करून घेतो हादेखील चर्चेचा विषय झाला आहे.आंदोलनाचा गैरफायदा नकोकुरकुंभ येथील जनआक्रोश झाला आहे. मात्र या आक्रोशामधून कुणाचाही आर्थिक फायदा होऊ न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. कुठल्याही स्थितीत या आंदोलनाच्या माध्यमातून दलाल निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची चर्चा सुरू आहे. काही ग्रामस्थ व स्थानिक नेते या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन कंपनी प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही घाबरू नका आम्ही आहे, असे सांगून मलई खातात.