शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

सांडपाण्यामुळे भामा नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे ...

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे सांडपाणी पठारवाडी मार्गे कौटकरवाडी ते काळुस येथील भामानदी पात्रात सोडले जात आहे. प्लॅस्टिक, वैद्यकीय कचऱ्यामुळे पाण्याला साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगून वर आला आहे. हेच फेसाळलेले सांडपाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. शिवाय ज्या नागरिकांनी या पाण्याचा वापर केला त्यांना त्वचा रोगाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

चाकण शहरातून जाणाऱ्या या ओढ्यामध्ये लगतच्या ग्रामपंचायतींसह औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी सोडण्यात येत आहे. हेच पाणी शहरातून पुढे पठारवाडी भागातून काळूस येथे भामा नदीला जाऊन मिळते. काळूस, पठारवाडी, राक्षेवाडी, कौटकरवाडी, टेमगिरेवाडी, खैरेवाडी या भागातील शेतकरी शेतीसाठी हे पाणी वापरतात. फेसाळयुक्त सांडपाणी शेतातील पिकांना वापरल्यावर शेतात काळ्या व हिरव्या रंगाचे केमिकलचे थर साचतात. यामुळे शेतीमाल ही खराब होत आहे.

वाढत्या नागरिकीकरणामुळे सांडपाण्याचा स्रोत मोठा आहे. तसेच वारंवार ओढ्यातील गाळमिश्रीत कचरा काढल्याने ओढ्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर ठिकठिकाणी साकव पुल बांधले आहे. पठारवाडी जवळील साकव पुलाजवळ या सांडपाण्याला फेस आला आहे. हेच पाणी पुढे भामा नदीत सोडले जाते. याच पाण्याचा शेतकरी शेती पिकविण्यासाठी करत आहे. या पाण्यावर पिकवलेला भाजीपाला चाकण बाजारात विक्रीला आल्यावर ग्राहकही कुठला भाजीपाला असा प्रश्न विचारतात. पर्यायाने भाजीपाला घेणारा खरेदी करत नाही. तसेच शेतातील पिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या माणसाच्या हातापायाला खाज येणे व त्वचेचे आजार उद्भवू लागले आहेत. जनावरांनाही हे पाणी वापरण धोकादायक झालं आहे.

चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलावे, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शहरातील इतर वापरासाठी उपयोगात आणावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वी नगरपरिषदेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवून परिसरातील शेतकऱ्यांची शेती विषमुक्त करावी असे मागणी पत्र दिले आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

१४ चाकण

चाकण शहरातून जाणाऱ्या ओढ्यातील पाणी फेसाळले.