शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
4
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
7
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
9
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
10
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
11
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
12
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
13
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
14
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
15
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
16
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
17
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
18
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
19
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
20
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !

सांडपाण्यामुळे भामा नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे ...

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे सांडपाणी पठारवाडी मार्गे कौटकरवाडी ते काळुस येथील भामानदी पात्रात सोडले जात आहे. प्लॅस्टिक, वैद्यकीय कचऱ्यामुळे पाण्याला साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगून वर आला आहे. हेच फेसाळलेले सांडपाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. शिवाय ज्या नागरिकांनी या पाण्याचा वापर केला त्यांना त्वचा रोगाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

चाकण शहरातून जाणाऱ्या या ओढ्यामध्ये लगतच्या ग्रामपंचायतींसह औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी सोडण्यात येत आहे. हेच पाणी शहरातून पुढे पठारवाडी भागातून काळूस येथे भामा नदीला जाऊन मिळते. काळूस, पठारवाडी, राक्षेवाडी, कौटकरवाडी, टेमगिरेवाडी, खैरेवाडी या भागातील शेतकरी शेतीसाठी हे पाणी वापरतात. फेसाळयुक्त सांडपाणी शेतातील पिकांना वापरल्यावर शेतात काळ्या व हिरव्या रंगाचे केमिकलचे थर साचतात. यामुळे शेतीमाल ही खराब होत आहे.

वाढत्या नागरिकीकरणामुळे सांडपाण्याचा स्रोत मोठा आहे. तसेच वारंवार ओढ्यातील गाळमिश्रीत कचरा काढल्याने ओढ्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर ठिकठिकाणी साकव पुल बांधले आहे. पठारवाडी जवळील साकव पुलाजवळ या सांडपाण्याला फेस आला आहे. हेच पाणी पुढे भामा नदीत सोडले जाते. याच पाण्याचा शेतकरी शेती पिकविण्यासाठी करत आहे. या पाण्यावर पिकवलेला भाजीपाला चाकण बाजारात विक्रीला आल्यावर ग्राहकही कुठला भाजीपाला असा प्रश्न विचारतात. पर्यायाने भाजीपाला घेणारा खरेदी करत नाही. तसेच शेतातील पिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या माणसाच्या हातापायाला खाज येणे व त्वचेचे आजार उद्भवू लागले आहेत. जनावरांनाही हे पाणी वापरण धोकादायक झालं आहे.

चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलावे, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शहरातील इतर वापरासाठी उपयोगात आणावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वी नगरपरिषदेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवून परिसरातील शेतकऱ्यांची शेती विषमुक्त करावी असे मागणी पत्र दिले आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

१४ चाकण

चाकण शहरातून जाणाऱ्या ओढ्यातील पाणी फेसाळले.