शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आलेगाव पागात भीषण पाणीटंचाई ,पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:10 IST

या भागात शेतकरी वर्गाने ऊस, भुईमूग, कांदा यांसारखी पिके घेतली आहे. परंतु हा तलाव आमदार अशोक पवार दिवाळीपूर्वी चासकमान ...

या भागात शेतकरी वर्गाने ऊस, भुईमूग, कांदा यांसारखी पिके घेतली आहे. परंतु हा तलाव आमदार अशोक पवार दिवाळीपूर्वी चासकमान आवर्तन सोडून भरला होता. या भागात पाणीटंचाई तीव्र जाणवत होती. परंतु त्यानंतर या तलावात पाणी न सोडल्याने या भागातील शेतकरी वर्गाची पिके जळून चालली आहे. गेल्या आठवड्यात चारी २० नंबरला चासकमान आवर्तन सोडले होते. परंतु हे पाणी मधेच बंद केल्याने या भागात पाणी पोहचू शकले नाही. अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता पाणी सोडण्याचे पोकळ आश्वासन दिले जात आहे. आलेगावपागा परिसरातील शेतकरी यांच्या सातबारावर चासकमान भूसंपादन राखीव असा शेरा पडलेला असून ही या भागातील शेतकरी हा चासकमान पाणी आवर्तनपासून वंचित आहे. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यास या भागातील व ओढ्या जवळील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे शेंडगेवाडी तलावात चासकमान आवर्तन सोडून भरावा, अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी केले आहे.

शेंडगेवाडी तलावात पाणी सोडल्यामुळे चारी नंबर २० वरून येणाऱ्या ओढ्यालगतच्या आंबळे, न्हावरे, कोळपे वस्ती तसेच निंबाळकर तलाव भरून हे पाणी शेंडगेवाडी तलावात येत असते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल त्यांच्या पाण्यासाठी त्यात वाढ होऊन पाण्याची पातळी वाढते. चासकमानचे आवर्तन चारी नंबर २० वरून शेंडगेवाडी तलावात पाणी आमदार अशोक पवार यांनी सोडावे, अशी शेतकऱ्यांच्या वतीने भाऊसाहेब भोसले यांनी मागणी केली आहे.

आलेगाव पागा, न्हावरे येथील शिवजवळील कोरडा ठाण पडलेला शेंडगेवाडी तलाव.