शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुण्यात पुन्हा गाड्या पेटवून देण्याचा प्रकार; ७ दुचाकींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 10:08 IST

सातारा रोडवरील बालाजीनगरमधील घटना

पुणे : रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या पेटवून देण्याचा प्रकार पुण्यात मध्यरात्री पुन्हा घडला आहे. पुणे सातारा रोडवरील बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस येथे मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेल्या दुचाकींना आग लावण्यात आली. या आगीत ७ दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी बालाजीनगर येथे गाड्यांना आग लागल्याचा कॉल होता, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.  त्यानंतर कात्रज येथील गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी काही वेळातच ही आग विझवली. या आगीत ३ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून ३ अर्धवट जळाल्या आहेत. तर एका गाडीला आगीची झळ पोहचली आहे. या गाड्या जेथे पार्क केल्या होत्या, त्याच्या वरील बाजूने काही तारा गेल्या होत्या. या आगीमध्ये त्या ताराही जळून खाक झाल्या. या गाड्यांच्या आगीची धग इतकी जास्त होती की, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या टपऱ्यांची शटरही तापली होती. ही आग नेमकी गाड्या पेटवल्यामुळे लागली की या गाड्यांच्या वरुन गेलेल्या तारांमधून शार्ट सर्कीट झाल्याने लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. सहकारनगर पोलीस ठाण्याकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.