शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

घातक शीतपेयांची विक्री, सर्व नियम कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:57 IST

उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाºया विक्रेत्यांच्या शीतपेयांची, खाद्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याला अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळच नसल्याचे दिसत आहे.

मोशी : उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली, तरी उघड्यावर शीतपेये आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाºया विक्रेत्यांच्या शीतपेयांची, खाद्याच्या नमुन्यांची तपासणी करण्याला अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) वेळच नसल्याचे दिसत आहे. कारण उन्हाळा सुरू होणार असून, त्यांच्याकडून अद्यापही तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली नाही. शीतपेय विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ आणि पेयांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात यावी आणि दोषी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोशी आणि चिखलीतील ग्राहकांकडून करण्यात येत आहे.उन्हाळ्याला सुरुवात होताच शहराच्या सर्वच भागांत आणि प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शीतपेय विक्रीची अनेक दुकाने थाटली आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणाºयांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये दिलासादायक वाटतात. त्यामुळेच या शीतपेयांना मागणी वाढते.थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट विक्रेते, फास्ट फूडविक्रेते यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. फिरत्या शीतपेये आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची कुठलीच मोहीम सुरू न केल्याने मोशीकरांच्या आरोग्याशीच हा खेळ होत असल्यामुळे मोशी आणि चिखलीकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आमच्या उत्पादनाचा दर्जा उत्तमचआम्ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळत नाही. अनेक वर्षांपासून आम्ही हाच व्यवसाय करत असून परवाना नसला, तरी आमच्या उत्पादनाचा दर्जा उत्तमच असतो, अशी माहिती मोशी येथील शीतपेय विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.एफडीएकडे नोंदणी बंधनकारकमात्र, या विक्रेत्यांकडची शीतपेये आरोग्यास हितकारक आहेत की नाही, याची शहानिशा करण्याची आणि अशा विक्रेत्यांना परवाना देण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनावर (एफडीए) आहे. अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार तर अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाºया सर्वच फिरत्या विक्रेत्यांना एफडीएकडे नोंदणी बंधनकारक आहे. या परवानगीशिवायच अनेक विक्रेते मोशी, चिखलीमध्ये सर्रास शीतपेय विक्री करीत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध रंगांचा वापर करून शीतपेयांची विक्री करतात. प्रत्यक्षात नैसर्गिक रंगांचे किंवा आयएसआय मार्क असलेले रंगच वापरणे आवश्यक आहे. कुठल्याही रसायनांचा शीतपेयांमध्ये वापर केला जाऊ नये.सर्व नियम कागदावरच!चव किंवा रंगांचे पदार्थ प्रमाणातच वापरावेत, छापील किमतीपेक्षा जास्त दराने शीतपेयांची विक्री करणे गुन्हा असतानाही अशी वाढीव दराने विक्री सुरूच आहे. हे सर्व नियम कागदावरच राहिले आहेत. फळांचा रस विक्री करणारे विक्रेतेही वाढले असून, त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाची फळे वापरली जात आहेत. उन्हाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे माहीत असूनही संबंधित प्रशासनाकडून कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आलेली नाही.