शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:46 IST

शतकोत्तर तपपूर्तीचा टप्पा ओलांडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विसाव्या शतकातले ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.

पुणे - शतकोत्तर तपपूर्तीचा टप्पा ओलांडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील विसाव्या शतकातले ‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. संस्थेची उद्दिष्टे व फलश्रुती, वाङ्मयीन व सामाजिक पर्यावरणविषयक लेख, व्यक्तिवेध, मराठी भाषाविषयक लेख, पुस्तक परीक्षणे, मराठी साहित्य विश्वाचे कवडसे, व्यापक साहित्य विश्वाचे भान अशा सात विभागांत मिळून ७५ निवडक लेख वाचकांना ७०० पृष्ठांच्या या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प हाती घेण्यातआला.‘अक्षरधन निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक’ या ग्रंथाचे संपादन साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.रा. भि. जोशी, दत्तो वामन पोतदार, दु. का. संत, पु. य. देशपांडे, ग. त्र्यं. माडखोलकर, श्री. ना. बनहट्टी, श्री. शं. नवरे, म. श्री. दीक्षित, रा. ब. महाजनी, वि. वा. शिरवाडकर, रा. शं. वाळिंबे, प्रतापराव शिंदे, गंगाधर पानतावणे, चंद्रकांत बांदिवडेकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. गं. ना. जोगळेकर, कमल देसाई, प्रा. गं. बा. सरदार, वा. रा. ढवळे, सोपानदेव चौधरी, गो. म. कुलकर्णी, म. पु. केंदूरकर, दादूमिया, रुपसिंह सुंदरसिंह, ग. वा. तगारे, गो. कृ. मोडक, रा. श्री. जोग, शं. गो. तुळपुळे, सरोजिनी बाबर, धर्मानंद कोसंबी, ना. म. भिडे, ना. गो. चापेकर, श्री. रा. टिकेकर, वा. रं. सुंठणकर, म. प. पेठे, ह. श्री. शेणोलीकर, दि. के. बेडेकर, इंदिरा संत, के. नारायण काळे, ना. सी. फडके, कुमुदिनी घारपुरे, भीमराव कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, अशोक निरफराके, डॉ. वसंत स. जोशी, वसंत आबाजी डहाके, सदा कºहाडे, रंगनाथ पठारे, प्रा. रा. ग. जाधव, श्री. के क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, श्रीरंग संगोराम, डॉ. म. द. हातकणंगलेकर, डॉ. प्रभाकर पाटील, द. श्री. बापट, अ. ना. देशपांडे या मान्यवर लेखकांसह अनेक लेखकांचे महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात असणार आहेत.मुखपत्राचा उपयोग परिपूर्तीसाठी१ प्रा. जोशी म्हणाले, ‘१९०६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ‘मसाप पत्रिका’ हे मुखपत्र १९१३ पासून मासिकरूपात विविध ज्ञानविस्तारबरोबर प्रकाशित होण्यास प्रारंभ झाला. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या परिषदेने आपल्या मुखपत्राचा उपयोग संस्थेच्या ध्येय उद्दिष्ट यांच्या परिपूर्तीसाठी केलेला आहे. हा ग्रंथ वाचकांसाठी मोलाचा ठेवा ठरेल.’२ नीलिमा गुंडी म्हणाल्या, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका काढण्यामागे परिषदेची ध्येयदृष्टी होती, ती म्हणजे साहित्यिक बंधुभाव निर्माण करणे. पत्रिकेने मराठीच्या विकासप्रक्रियेत सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीपासून मराठी परिभाषानिर्मिती, समीक्षा-संशोधन यांना चालना तसेच वाङ्मय इतिहासलेखनासाठी वार्षिक समालोचनपर अंक काढणे, हे धोरण महत्त्वाचे आहे. पत्रिकेच्या स्वागतशील धोरणामुळे अनेक नवे-जुने लेखक पत्रिकेकडे वळलेले दिसतात. पत्रिकेतील निवडक लेखसंग्रहम्हणजे ‘अक्षरधन’च ठरणार आहे. त्यातून मराठी साहित्यपरंपरेचे अर्करूप दर्शनही घडेल.महाराष्ट्र साहित्य पत्रिका (त्रैमासिक) विसाव्या शतकातील संपादकवि. मो. महाजनी, ना .गो. चापेकर, द. वा. पोतदार, माधवराव पटवर्धन, मो. ज्ञा .शहाणे , रा. श्री. जोग , के. ना. काळे, श्री. म. माटे, य. दि .पेंढरकर, रा . शं. वाळिंबे, वि . भि .कोलते, वा. रा. ढवळे, श्री. के. क्षीरसागर , स. गं. मालशे, भालचंद्र फडके, हे . वि. इनामदार, आनंद यादव, भीमराव कुलकर्णी, वसंत स. जोशी, शंकर सारडा, वि .स. वाळिंबे, ह. ल. निपुणगे.महाराष्ट्र साहित्य पत्रिकेने काढलेले काही विशेषांकश्रीपाद कृष्ण कोल्हटकर विशेषांक, महर्षी शिंदे विशेषांक , ज्ञानेश्वर विशेषांक (मुद्रण व मांडणीसाठी केंद्रसरकारचा पुरस्कारप्राप्त), पु. ल देशपांडे विशेषांक, ग्रामीण साहित्य विशेषांक, दलित साहित्य विशेषांक, गझल विशेषांक इत्यादी.ज्या काळात वाडमयीन नियतकालिकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती त्या काळात मसाप पत्रिकेने एका विशिष्ट वाडमयीन भूमिकेतून काम केले. मसापत्रिकेत समकालीन वाडमयीन वातावरण व त्याचे प्रवाह यांचे प्रतिबिंब पडले आहे. विसाव्या शतकात मराठी साहित्य विश्वात स्वत:ची नाममुद्रा उमटवणा-या सर्व मान्यवर आणि महत्वाच्या लेखकांची उपस्थिती हे अंकाचे वैशिष्टय म्हणता येईल. हा ग्रंथ म्हणजे शतकातील साहित्याचा छेद आहे.- डॉ.अरूणा ढेरे,संशोधन विभागप्रमुख

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या