शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

पुण्यातून उलगडणार अंतरिक्षाचे गुपीत...!; इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्सची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:55 IST

उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखगोल विज्ञान हा प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटकसंस्थेत ९ वर्षापुढील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधन विषयांचा शिकवला जाणार अभ्यास

अभिजीत डुंगरवाल बिबवेवाडी : शहरातील शैक्षणिक संस्थांमधून कुशल तंत्रज्ञ, अभियंते तयार होत असताना उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे झाले आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे.

खगोल विज्ञान हा केवळ शालेय अभ्यासक्रमात शिकण्याचा किंवा वेधशाळेत अभ्यास करण्याचा विषय नसून हा प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. खगोलशास्त्र, खगोल अभ्यास म्हणूनच प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे. आज जगात खगोलशास्त्रात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. नासा, इसा, इस्रो या अवकाश संस्था चंद्र, मंगळ ग्रहीय मोहिमा राबवत आहेत. अवकाशाचे गूढ सातत्याने उलगडले जात आहे. या निमित्ताने भारतभरातील विद्यार्थीदेखील या शाखेकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहत आहेत. विज्ञानप्रसारक म्हणून काम करायचे असल्यास विज्ञान व खगोल विज्ञानाचा पुरेसा अभ्यास करणे गरजेचे असते. प्रथमत: आकाश निरीक्षणाची सवय जडणे अत्यावश्यक आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा निरीक्षणातून, अनुभवातून कायमचे ज्ञान मिळते.

आयएएसएस  या संस्थेत ९ वर्षापुढील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधन, निरीक्षण, ग्रह-तारे यांचा अभ्यास, ग्रहणे, धुमकेतू, अवकाशातील आश्चर्य, सूर्यमाला, विश्व, ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू, आकाश दर्शन, उल्कावर्षाव, लघुग्रह, अशनी, ग्रहणे, दुर्बिणींचे प्रकार अशा अनेक विषयांचा अभ्यास शिकवला जाणार आहे. तसेच चित्र व ध्वनिफितीच्या साह्याने विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा प्राचीन इतिहास सांगितला जाणार असून खगोलशास्त्रीय बाबींची उकलही या संस्थेंतर्गत करण्यात येणार आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांना स्वत: चा टेलीस्कोप बनविण्याचे शिकविण्यात येणार आहे. रॉकेट, सॅटलाईट कसे बनते हे दाखवण्यात येत आहे. खगोलशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, या उद्देशाने या संस्थेची  स्थापना करण्यात आली आहे. अंतराळात धाव घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम यानिमित्ताने केले जाणार आहे. दुर्बिणीशिवायही खगोलीय घटनांचे निरीक्षण करता येते. बुध, शुक्र हे ग्रह सूर्यासमोर असताना दिसत नाहीत. परंतु ते नेहमी सूर्योदयापूर्वी पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला काही तास दिसतात. नियमित निरीक्षणाने किंवा वार्षिक वेळापत्रकाच्या संदर्भाने आपण ग्रहांच्या उगविण्याची व मावळण्याची वेळ पाहू शकतो. हे दोन्ही ग्रह साध्या डोळ्यांनी पाहू शकतो. दुर्बिण (चार ते पाच इंच व्यासाची) असल्यास शुक्राच्या कळा पाहता येतात. मंगळ, गुरू, शनी हे ग्रहसुद्धा साध्या डोळ्यांनी पाहता येतात. दुर्बिणीने गुरूचे दोन समांतर पट्टे आणि चार उपग्रह पाहता येतात. शनीची रिंग पाहता येते. हे तीनही ग्रह रात्री पूर्वेकडून उगवल्यानंतर मावळेपर्यंत दररात्री पाहता येऊ शकतात. दररोज अवकाशात स्वत: भोवती व सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी, दररोज अवकाशात उगवणारा व मावळणारा सूर्य, कलेकलेने मोठा होत जाणारा चंद्र, सूर्य-चंद्र-ताऱ्यांपासून मिळणारा प्रकाश, गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आणि एकूणच आपल्या दैनंदिन घडामोडी या खगोलीय नियमानुसार घडत असतात. निसर्गाची व मानवाची प्रत्येक हालचाल ही विज्ञानाच्या नियमानुसार नियंत्रित होत असते. म्हणून आपण एकदा विज्ञानाचे नियम समजून घेतले तर आपल्या जीवनात दु:ख, चिंता कमी होऊन आनंद दुणावेल.आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्या घडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच विज्ञान आणि संशोधनाच्या शाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत. अवकाश निरीक्षक बनण्यासाठी विज्ञान शाखेच्या फारशा पदव्यांची गरज नाही. खगोलीय घडामोडी जाणण्याची व पाहण्याची आवड आहे. निरीक्षणासाठी वेळ आहे तो प्रत्येकजण खगोलप्रेमी, निरीक्षक व अभ्यासक बनू शकतो. बहुतांशी प्रगत देशांमध्ये देशाच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे दोन टक्के हिस्सा हा विज्ञान संशोधनासाठी राखून ठेवलेला असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्रमाण अर्ध्या टक्क्यांच्या आसपास होते. गेल्या काही वर्षांत भारत अनेक नवनवीन वैज्ञानिक महाप्रकल्पांमध्ये सहभागी होत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतवले जात आहेत. आणि त्याचबरोबर सध्याची आघाडीच्या वैज्ञानिकांची पिढी ही हळूहळू निवृत्तीकडे सरकत आहे. त्यामुळे या महाप्रकल्पांचा उपयोग करून घेण्यासाठी देशाला मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिकांची गरज आहे. जे हुशार विद्यार्थी या घडीला संशोधनाचे क्षेत्र निवडतील त्यांना येत्या काही वर्षांत भारतीय संशोधन क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. 

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञान