शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:34 IST

शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते.

पुणे : इयत्ता अकरावीच्या दुस-या प्रवेश फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते. दुस-या फेरीत सुमारे २५ हजार ६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.या प्रक्रियेत सुमारे ७६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. पहिल्या पसंती क्रमानुसार निवड झालेल्या, परंतु प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत संधी देण्यात आली. या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.या यादीमध्ये एकूण २५ हजार ६७६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दि. १९ ते २१ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांचे कटआॅफ गुण दुसºया फेरीतही नव्वदीच्या पुढेच राहिले आहेत. पहिल्या फेरीच्या तुलनेत या फेरीतील गुणांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे पहिल्या फेरीचे अनुदानित तुकडीचे खुल्या गटातील कटआॅफ गुण ९५ टक्के होते. दुसºया फेरीत त्यामध्ये केवळ ०.६० टक्क्याचा फरक पडला आहे.आपटे प्रशालेचे विज्ञान शाखेचे कटआॅफ पहिल्या फेरीत ९७.६०, तर दुसºया फेरीत ९६.२० टक्के राहिले. सप महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड टक्क्याचा फरक पडला आहे. हीच स्थिती फर्ग्युसन अन्य काही प्रमुख महाविद्यालयांची होती.दुसरी संधी : सहज प्रवेश मिळणारशहरातील प्रमुख महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पसंती दिली जाते. त्यामुळे चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या फेरीत संधी गेल्याने दुसºया फेरीतही या महाविद्यालयांना पसंती दिली आहे. प्रामुख्याने पहिल्या फेरीतच या महाविद्यालयांच्या बहुतेक जागा भरल्या जातात. केवळ काही जागा रिक्त असल्याने दुसºया फेरीचे कटआॅफ वाढते. तिसºया फेरीतही त्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. इतर महाविद्यालयांच्या कटआॅफमध्ये मात्र मोठा फरक पडत जातो. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPuneपुणे