शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:34 IST

शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते.

पुणे : इयत्ता अकरावीच्या दुस-या प्रवेश फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते. दुस-या फेरीत सुमारे २५ हजार ६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.या प्रक्रियेत सुमारे ७६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. पहिल्या पसंती क्रमानुसार निवड झालेल्या, परंतु प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत संधी देण्यात आली. या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.या यादीमध्ये एकूण २५ हजार ६७६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दि. १९ ते २१ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांचे कटआॅफ गुण दुसºया फेरीतही नव्वदीच्या पुढेच राहिले आहेत. पहिल्या फेरीच्या तुलनेत या फेरीतील गुणांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे पहिल्या फेरीचे अनुदानित तुकडीचे खुल्या गटातील कटआॅफ गुण ९५ टक्के होते. दुसºया फेरीत त्यामध्ये केवळ ०.६० टक्क्याचा फरक पडला आहे.आपटे प्रशालेचे विज्ञान शाखेचे कटआॅफ पहिल्या फेरीत ९७.६०, तर दुसºया फेरीत ९६.२० टक्के राहिले. सप महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड टक्क्याचा फरक पडला आहे. हीच स्थिती फर्ग्युसन अन्य काही प्रमुख महाविद्यालयांची होती.दुसरी संधी : सहज प्रवेश मिळणारशहरातील प्रमुख महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पसंती दिली जाते. त्यामुळे चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या फेरीत संधी गेल्याने दुसºया फेरीतही या महाविद्यालयांना पसंती दिली आहे. प्रामुख्याने पहिल्या फेरीतच या महाविद्यालयांच्या बहुतेक जागा भरल्या जातात. केवळ काही जागा रिक्त असल्याने दुसºया फेरीचे कटआॅफ वाढते. तिसºया फेरीतही त्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. इतर महाविद्यालयांच्या कटआॅफमध्ये मात्र मोठा फरक पडत जातो. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPuneपुणे