शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:34 IST

शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते.

पुणे : इयत्ता अकरावीच्या दुस-या प्रवेश फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. शहरातील काही ठराविक महाविद्यालयांच्या पहिल्या व दुस-या फेरीच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड गुणाचा फरक असल्याने या फेरीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते. दुस-या फेरीत सुमारे २५ हजार ६०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.या प्रक्रियेत सुमारे ७६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी २१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. पहिल्या पसंती क्रमानुसार निवड झालेल्या, परंतु प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत संधी देण्यात आली. या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.या यादीमध्ये एकूण २५ हजार ६७६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दि. १९ ते २१ जुलै या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांचे कटआॅफ गुण दुसºया फेरीतही नव्वदीच्या पुढेच राहिले आहेत. पहिल्या फेरीच्या तुलनेत या फेरीतील गुणांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे पहिल्या फेरीचे अनुदानित तुकडीचे खुल्या गटातील कटआॅफ गुण ९५ टक्के होते. दुसºया फेरीत त्यामध्ये केवळ ०.६० टक्क्याचा फरक पडला आहे.आपटे प्रशालेचे विज्ञान शाखेचे कटआॅफ पहिल्या फेरीत ९७.६०, तर दुसºया फेरीत ९६.२० टक्के राहिले. सप महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कटआॅफमध्ये केवळ एक ते दीड टक्क्याचा फरक पडला आहे. हीच स्थिती फर्ग्युसन अन्य काही प्रमुख महाविद्यालयांची होती.दुसरी संधी : सहज प्रवेश मिळणारशहरातील प्रमुख महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पसंती दिली जाते. त्यामुळे चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या फेरीत संधी गेल्याने दुसºया फेरीतही या महाविद्यालयांना पसंती दिली आहे. प्रामुख्याने पहिल्या फेरीतच या महाविद्यालयांच्या बहुतेक जागा भरल्या जातात. केवळ काही जागा रिक्त असल्याने दुसºया फेरीचे कटआॅफ वाढते. तिसºया फेरीतही त्यामध्ये फारसा फरक पडणार नाही. इतर महाविद्यालयांच्या कटआॅफमध्ये मात्र मोठा फरक पडत जातो. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPuneपुणे