शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा डोस देण्यास प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST

पुणे : जास्तीत जास्त नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटपासूनही संरक्षण मिळू शकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या ...

पुणे : जास्तीत जास्त नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटपासूनही संरक्षण मिळू शकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आणि राज्य सरकारकडून जिल्ह्यांमधील लसीकरण यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात किती नागरिकांचे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दुसरे डोस शिल्लक आहेत, याची माहिती लसीकरण यंत्रणेला कळवली जाणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ३८ लाख ८४ हजार ४५० नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस, ९ लाख ९९ हजार ५९४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ६३ हजार ९११ आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ७४ हजार ८५४ इतकी आहे. स्पुटनिक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ७४२० इतकी आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड घेणाऱ्यांचे प्रमाण ९१ टक्के, तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाण ९ टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारला दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, लसींच्या पुरवठ्याचा अभाव असल्यामुळे अनेकांच्या दुसऱ्या डोसचा कालावधी लांबला आहे. सर्व जिल्ह्यांमधील लसीकरण यंत्रणांनी अशा नागरिकांचा दुसरा डोस देण्यास प्राधान्य द्यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरण प्रक्रिया जलद करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. वैद्यकतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ८०-९० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाची लाट रोखणे अवघड आहे. सध्या लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत.

---------------

अद्याप इतके दुसरे डोस देणे बाकी

आरोग्य कर्मचाऱ्यांपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अत्यावश्यक कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगट आणि १८ ते ४४ वयोगट अशा क्रमाने लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. अद्याप ४० टक्के आरोग्य कर्मचारी, ३९ टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तर ७५ टक्के ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक आहे. ४५ ते ५९ वयोगटातील केवळ १९ टक्के नागरिकांना, तर १८ ते ४४ वयोगटातील १ टक्का नागरिकांनाच दुसरा डोस मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून दुसरा डोस घेणे बाकी असलेले आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांची यादीच देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.