शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची शोध मोहिम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST

जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे ८५ हजार लाभार्थी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे तब्बल ८५ हजार ...

जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे ८५ हजार लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे तब्बल ८५ हजार पेक्षा अधिक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु अनेक लाभार्थी मयत झाले तरी त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होते. अशा मयत झालेल्या लाभार्थ्यांचे नाव अनुदानाच्या यादीतून रद्द करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना पत्र दिले आहे. यात मयत, पाच-सहा महिने पेशन्स उचलली नसेल तर पैसे सरकार जमा कारण्याचे बँकांना आदेश दिले आहेत.

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधारांना दर वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान आपण हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिल्यानंतरच संबंधित व्यक्तीला शासनाकडून देण्यात येणारे अनुदान बँक खात्यावर जमा केले जाते. बोगस लाभार्थी रोखण्यासाठीच शासनाकडून हयातीचा दाखला दर वर्षी देणे बंधनकारक केले आहे. दर वर्षी मार्च अखेर पर्यंत हे हायातीचे दाखले घेतले जातात. परंतु लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने अनेक वेळा लाभार्थी मयत झाला तरी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत राहतात. यामुळेच जिल्हा प्रशासनाने बँकांना पत्र पाठवले आहे.

---

जिल्ह्यात या योजनाचे हे आहेत लाभार्थी

- संजय गांधी निराधार योजना : ४२ हजार १९४

- श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजना : ३१ हजार ६३८

- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना : १० हजार ३६०

- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना : १२७

- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना : ७६९

---

दर वर्षी बँकेत हायातीचा दाखला सादर करावा लागतो

शासनाकडून अनुदान देण्यासाठी दर वर्षीच हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिला नाही तर अनुदान बंद केले जाते. पण दखला मिळवणे आणि तो बँकेत सादर करणे मोठे दिव्यच पार पाडावे लागते.

- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेचा लाभार्थी

---

दर वर्षी बँकांना असे पत्र पाठवले जाते

जिल्ह्यात ८५ हजार पेक्षा अधिक लाभार्थी आहेत. यात कोणी मयत झाले तर त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळत नाही.अनुदान सुरू ठेवण्यासाठी दर वर्षी मार्च अखेर पर्यंत हयात असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे. यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर हे दाखले आपल्या बँकेत जमा करावे. हयातीचा दाखला सादर न करणारे व पाच-सहा महिने अनुदानाचे पैसे न उचलणा-यांचे अनुदान पुन्हा शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

- संजय तेली, उपजिल्हाधिकारी, कुळ कायदा शाखा