शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभिंतीच्या वादावर अखेर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:12 IST

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार हाऊसिंग सोसायटी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सीमाभिंतीच्या वादावर अखेर पडदा पडला. बाजार समितीने जमिनीच्या विकसकास सीमाभिंत बांधण्यास, तसेच काम करण्यास अडथळा करू नये, असा आदेश दिवाणी न्यायाधीश सी. पी. भागवत यांनी दिला.

पुणे  - श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार हाऊसिंग सोसायटी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सीमाभिंतीच्या वादावर अखेर पडदा पडला. बाजार समितीने जमिनीच्या विकसकास सीमाभिंत बांधण्यास, तसेच काम करण्यास अडथळा करू नये, असा आदेश दिवाणी न्यायाधीश सी. पी. भागवत यांनी दिला. एक प्रकारे बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक आणि विद्यमान सचिव बी. जे. देशमुख यांना ही क्लीन चिट मानली जात आहे.बाजार समितीकडील १९ हजार ८५० चौरस मीटर जागा ८ नोव्हेंबर १९८९ च्या निवाडा अर्थात अ‍ॅवॉर्डप्रमाणे सोसायटीच्या हमालांच्या घरबांधणीसाठी आरक्षित करण्यात आली होती. तसेच १९८५ मध्ये केंजळे कुटुंबीयांनीदेखील हाऊसिंग सोसायटीस रजिस्टर दस्ताने जागा दिली होती. ही जागा बाजार समितीच्या हद्दीत असल्याने बाजार समिती १९९० पासून या ना त्या कारणाने सोसायटीला देण्यास टाळाटाळ करीत होती़ त्यानंतर १९९९ मध्ये उच्च न्यायालयासमोर तडजोड झाली.बाजार समिती हमालांना घरे बांधून देणार होती, मात्र तिथेही बाजार समिती फोल ठरली. त्यानंतर २००७ मध्ये परत संस्थेला उच्च न्यायालयात जाणे भाग पडले आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने तेव्हाचे माजी प्रशासक आणि विद्यमान सचिव बी. जे. देशमुख आणि त्यावेळच्या पणन संचालकांना उच्च न्यायालयात स्वत: हजर राहण्यास सांगितले. त्या वेळी संबंधित जागा हमालांच्या घरबांधणीला देण्यासाठी खडसावले. त्यानंतर देशमुख यांनी सात दिवसांत पणन संचालकांची १२ (१) ची परवानगी घेऊन ही जागा हाऊसिंग सोसायटीला हस्तांतरित करण्याचे कबूल केले.या अटी आणि शर्ती २००७ ला झाल्या, तरी अभिहस्तांतरणाचा दस्त २०१३ ला झाला़ अभिहस्तांतर झाल्यानंतर संस्थेच्या विकसकाने सीमाभिंत घालण्याचे काम सुरू केले त्या वेळी त्यांना वारंवार अडथळे आणण्यात आले. दरम्यानच्या काळात प्रशासक म्हणून संजीव खडके यांची नियुक्ती झाली. त्यांनी जागेचा ताबा काढून का घेऊ नये, असे पत्र दिले. खडके यांनी दिलेल्या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचे सोसायटीला संरक्षण दिले व दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यास सांगितले.संस्थेने १० फेब्रुवारी २०१४ रोजी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. त्यास स्थगितीचा आदेश मिळाला. त्यानंतर बाजार समितीने वकिलामार्फत कोर्ट कमिशन नेमण्यात यावे, अशी विनंती न्यायालयात केली. कोर्ट कमिशनचा अहवालही कोर्टात आला. त्यानंतर २५ जानेवारीला न्यायालयाने सोसायटीच्या बाजूने निकाल दिला. त्यांना सीमाभिंत घालण्याबाबत २०११ च्या मोजणीनुसार आणि बाजार समितीचे विद्यमान सचिव बी़ जे़ देशमुख यांनी २८ जानेवारी २०१३ च्या पत्रानुसार जी परवानगी संस्थेला दिली होती, ती न्यायालयाने कायम ठेवली.बाजार समितीच्या विरोधात निकाल जाणे दुर्दैवी आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निकालातील सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासानंतर या निकालाच्याविरोधात वरच्या न्यायालयात अपील करणार आहे.- दिलीप खैरे, सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या