शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

विज्ञान शाखा ठरतेय वरचढ

By admin | Updated: June 21, 2017 06:22 IST

मागील सहा वर्षांपूर्वी आघाडीवर असलेल्या कला शाखेवर विज्ञान शाखा वरचढ ठरली आहे. शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात सुमारे ४ लाख ५७

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील सहा वर्षांपूर्वी आघाडीवर असलेल्या कला शाखेवर विज्ञान शाखा वरचढ ठरली आहे. शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात सुमारे ४ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांनी कला शाखेतून इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. त्या वेळी विज्ञान शाखेचे ३ लाख ६४ हजार विद्यार्थी होते. त्या तुलनेत शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये तब्बल १ लाख ७४ हजाराने वाढ झाली आहे, तर कला शाखेतील वाढ केवळ १८ हजारांवर मर्यादित राहिल्याचे दिसते. काही वर्षांपासून पारंपरिक अभ्यासक्रमांऐवजी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर मिळणाऱ्या विविध संधी यामुळे अनेक विद्यार्थी व पालक इयत्ता दहावीनंतर प्राधान्याने विज्ञान शाखेतून पुढील शिक्षण घेण्याला प्राधान्य देऊ लागले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र, स्थापत्यशास्त्र अशा विविध अभ्यासक्रमांना पसंती मिळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्या तुलनेत कला शाखे मागे पडू लागली आहे. तुलनेने कमी संधी असल्याने कलेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. कलेच्या तुलनेत वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे.शैक्षणिक वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ५७ हजार ५८ विद्यार्थी कला शाखेतील होते, तर विज्ञान शाखेतून सुमारे ३ लाख ६४ हजार आणि वाणिज्य शाखेतून २ लाख ८३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यावर्षी विज्ञानच्या तुलनेत कलेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल लाखभराने अधिक दिसून येते. त्यानंतर प्रत्येक वर्षी हे अंतर झपाट्याने कमी होत गेल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ज्या तुलनेत वाढत गेली त्या तुलनेत कला शाखेकडील कल कमी होत गेला आहे. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये विज्ञानाने कला शाखेला मागे टाकून आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी वेगाने वाढत असून कला शाखा खूप मागे पडली आहे.