शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

शालेय परिवहन समित्या कागदावरच

By admin | Updated: June 18, 2015 00:20 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत.

राजानंद मोरे, पुणेविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करून, त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे काम या समित्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक बस, रिक्षा व व्हॅनमधून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा सुटल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे बहुतेक शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले. शालेय; तसेच परिवहन विभागाने सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नियमावली तयार केली आहे. विशेषत: स्कूल बसबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त शाळांमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत योग्य नियोजन करण्याची जबाबदारी या समित्यांवर टाकण्यात आली आहे. स्कूल बस, रिक्षा, व्हॅनचालकांची बैठक घेणे, त्यांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत सूचना देणे, बसचालकाकडून सर्व नियम पाळले जात आहेत किंवा नाही, याची तपासणी करणे, रिक्षा, व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी समितीवर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, बहुतेक शाळांंकडून विद्यार्थी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहेत़स्कूल बसमध्ये महिला किंवा पुरुष सहायक, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. तसेच, बस सुरू असताना दरवाजा बंद करणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, याकडे बसचालक; तसेच सहायकही काणाडोळा करताना दिसतात. काही बसेसमध्ये सहायकही आढळून आले नाहीत; तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसही पाहायला मिळाल्या. रिक्षांना केवळ प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना देण्यात आला आहे. या नियमानुसार १२ वर्षांखालील मुले असल्यास रिक्षामध्ये ४ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास परवानगी असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगतात. मात्र, एका रिक्षामधून १० पेक्षा जास्त विद्यार्थी दाटीवाटीने नेले जात आहेत. रिक्षाप्रमाणेच व्हॅनमधूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वाहतूक केली जाते. काही ठराविक पद्धतीच्या व्हॅनलाच यासाठी परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नसलेल्या व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसून आल्या.नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीवर होणार कारवाईनियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. ही कारवाई स्कूल बससह रिक्षा व व्हॅनवरही केली जाणार आहे. त्यासाठी सध्या तीन पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील आठवड्यात आणखी तीन पथके या कारवाईसाठी दिली जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे.- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी