शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आरटीईअंतर्गत शाळा नोंदणी शनिवारपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:54 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवार,दि. २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये काढली जाणार आहे.आरटीईअंतर्गत गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविली जात आहे.पालकांनी आरटीई प्रवेशासाठी २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करायचे आहेत, प्रवेशाची पहिली सोडत १४ व १५ फेब्रुवारी या कालावधीत जाहीर केली जाणार आहे. प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी १६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत.पहिल्या फेरीत ज्या पालकांना अर्ज करता आला नाही, त्यांना अर्ज करण्यासाठी १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत पुन्हा संधी देण्यात येणार आहे. प्रवेशाची दुसरी सोडत ७ व ८ मार्च या कालावधीत जाहीर केली जाणार आहे. पालकांनी ९ मार्च ते १२ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नव्हते,त्यांना अर्ज करण्यासाठी ९ मार्च ते २२ मार्च या काळात पुन्हा संधी दिली जाणार आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक१. आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी - १० जानेवारी ते २० जानेवारी२. पालकांनी आॅनलाइन अर्ज भरणे - २४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी३. पहिली सोडत काढणे - १४ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी४. पालकांनी प्रवेश निश्चित करणे - १६ फेब्रुवारी ते १ मार्च५. पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - १६ फेब्रुवारी ते ३ मार्च६. दुसरी सोडत - ७ मार्च व ८ मार्च७. पालकांनी प्रवेश निश्चित करणे - ९ मार्च ते २१ मार्च८. पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - ९ मार्च ते २२ मार्च९. तिसरी सोडत - २६ मार्च व २७ मार्चआरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रेरहिवासी पुरावा-आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला), जन्म दाखला, बालकाचे पासपोर्ट साइज रंगीत छायाचित्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र