शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कूल आॅफ प्लॅनिंग’ पुण्यातच! मुख्यमंत्र्यांचे जावडेकरांना पत्र; संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 02:38 IST

केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे समजते.

- राजानंद मोरेपुणे : केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे ही संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत काही वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ची उभारणी करण्याचे धोरण आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्येही या संस्था सुरू करण्याचे नियोजन होते. त्याअनुषंगाने आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्था पुण्यात सुरू करण्याबाबत केंद्र सरकारला १७ जुलै २०१३ रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी १३ एकर जागा देण्याबाबतही अनुकूलता दर्शविण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत पुण्यात संस्था सुरू करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच युती सरकार आल्यानंतर ही संस्था पुण्यातून औरंगाबादला हलविण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी एकत्रित येत ही संस्था पुण्यातच व्हावी यासाठी जोरदार पाठपुरावा केला. औरंगाबादपेक्षा पुणे हे संस्थेसाठी योग्य ठिकाण असल्याचे तज्ज्ञांकडून पटवून देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ही संस्था पुण्यातच सुरू करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे आग्रह केला आहे. संस्थेसाठी जागाही प्रस्तावित असून ती मुंबई, अहमदाबाद व बंगळुरू या शहरांच्या जवळ आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने स्कूल आॅफ प्लॅनिंगची नितांत गरज आहे. त्यामुळे राज्याचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हब असलेल्या पुण्यात ही संस्था उभारावी, असे या पत्रात म्हटले आहे.स्मार्ट सिटीसारखी योजना प्रत्यक्षात येत असताना देशात सध्या नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. नगररचनाकारांची गरज लक्षात घेऊन ही संस्था तातडीने होणे आवश्यक आहे. संस्थेसाठी आवश्यक जागा, वातावरण तसेच आवश्यक तज्ज्ञांची उपलब्धता सहज होऊ शकते. या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाºया विद्यार्थ्यांसाठीही पुणे सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे इतर ठिकाणांचा विचार होणार आहे. संस्था लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. - रामचंद्र गोहाड, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे