शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शालेय साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: June 21, 2015 00:36 IST

महापालिका शिक्षण मंडळातील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाने शालेय साहित्य खरेदी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटपात दिरंगाई होत आहे,

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळातील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाने शालेय साहित्य खरेदी, विद्यार्थ्यांना साहित्य वाटपात दिरंगाई होत आहे, नियमबाह्य कामे सुरू आहेत, सभापतींची मनमानी सुरू आहे, गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी जनजागृती सेवा संघाचे अध्यक्ष संजय रावळ, के. व्ही. रमेश यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षण मंडळास बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असे सांगून सभापतींनी आक्षेपांचे खंडण केले आहे. शिक्षण मंडळाच्या वतीने महापालिका शाळेतील मुलांना शालेय साहित्य आणि गणवेश, दप्तर, बूट, रेनकाटचे वाटप केले जाते. शिक्षण मंडळ सदस्य, प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे मुलांना कधीही वेळेवर साहित्य मिळालेले नाही. याही वर्षी पहिल्या दिवशी केवळ पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. अधिकारांबाबतच्या मर्यादा आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे निविदाप्रक्रिया लांबल्याचे सदस्यांनी सांगितले होते. अन्य शालेय साहित्य महिनाभरात विद्यार्थ्यांना देणार असल्याचे प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय रावळ निवेदनात म्हणतात, शिक्षण मंडळाने अट्टहास करून काही ठेकेदार कंपन्यांचे नाव टाकून १८ ते २८ मेपर्यंत वह्या, दप्तर, बूट, रेनकोट, गणवेश, फुटपट्टी अशा निविदा प्रसिद्ध केल्या. ठेकेदार पात्र नसतानाही मनमानी आणि नियमबाह्य पद्धतीने साहित्य खरेदीचा घाट घातला. अपात्र ठेकेदारांना पात्र उर्वरित साहित्य खरेदीचे काम सुरू आहे. राइट टू एज्युकेशनच्या शासन निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी साहित्य पुरविणे आवश्यक होते. शाळा सुरू होऊन आठवडा पूर्ण होईल. मात्र, अजूनही शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अन्य साहित्य पोहोचलेले नाही. तसेच २०१५-१६ च्या शैक्षणिक साहित्य खरेदीची चौकशी राज्य शासनाच्या सचिवांनी लावली आहे. तसेच मंडळाने शासनास अहवाल सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)निविदा प्रक्रिया ही आॅनलाइन पद्धतीने, पारदर्शकपणे असते. अतिरिक्त आयुक्त, प्रशासन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हे काम होत असते. त्यानंतर कामाचे आदेश निघत असतात. प्रशासनाने विद्यार्थ्यांना वेळेत आणि चांगल्या दर्जाचे साहित्य मिळावे, यासाठीच आमचा पाठपुरावा असतो. प्रशासकीय प्रक्रियेत आमचा हस्तक्षेप नसतो. आम्ही कोणालाही झुकते माप देत नाही. सर्व अधिकाऱ्यांचा एकत्रितपणे निर्णय असतो. हेतुपुरस्सरपणे जाणीवपूर्वक काही लोक माझ्यावर आरोप करतात. या गोष्टींशी माझा वैयक्तिक संबंध नाही. शिक्षण मंडळाची बदनामी करण्याचा प्रकार आहे.- धनंजय भालेकर, सभापती