शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीसाठी शिष्यवृत्तीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 03:04 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत अखिल भारतीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या निवडीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने राज्य शासनातर्फे गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत अखिल भारतीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या निवडीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने राज्य शासनातर्फे गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. शासनातर्फे तीन स्तरात ही शिष्यवृत्ती राबविली जाणार असल्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाकडून राज्यात मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नाशिक या ६ ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संस्थांमधून प्रत्येक वर्षी सुमारे ६०० उमेदवारांना विद्यावेतन, मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह, ग्रंथालय आदी सुविधा पुरविल्या जातात. मात्र, भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने शासनाने यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांना मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्थसाहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील गुणवान व होतकरू उमेदवारांसाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना राबविली जाणार आहे.उमेदवारांना मुलाखतीपर्यंतच्या कालावधीसाठी दिल्ली येथील निवडक प्रशिक्षण वर्गांमध्ये उपलब्ध अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. उमेदवारास भाग१, भाग २, भाग ३ या या योजनेचा लाभ एकदाच दिला जाईल. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास यूपीएससीची संबंधित परीक्षा देणे बंधनकारक असेल, अन्यथा शिष्यवृत्तीची रक्कम एकरकमी शासनास परत करण्याचे बंधनपत्र उमेदवारास लिहून देणे आवश्यक राहील, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)निकषांची पूर्तता करणे आवश्यकशिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवारांना शासनाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येईल. उमेदवाराचे व त्याचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पादन १० लाखांपर्यंत असावे. मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या मात्र भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड न झालेले उमेदवार, या योजनेसाठी अर्ज करू शकतील. उमेदवारांना पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, केंद्रीय लोकसेवा अयोगाच्या परीक्षेची गुणपत्रिका आदी कागदपत्रे सादर करावी लागतील.