शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सयाजीरावांचा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 02:28 IST

बारा खंड प्रकाशित : जगभरातील जाणकारांशी पत्रव्यवहार

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुरोगामी दृष्टीचे संस्थानिक, कलासक्त राजे आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या समाजाभिमुख कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सयाजीरावांचा जीवनप्रवास अधोरेखित करणारे ५० खंडांवर चरित्र साधन समितीचे काम सुरू आहे. त्यापैकी १२ खंड बडोदा येथील साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले असून, उर्वरित १३ खंडही प्रकाशित होत आहे. ११ मार्च रोजी सयाजीरावांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा पत्रप्रपंच आणि भाषणे अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय चरित्र साधन समितीने घेतला आहे. यासंदर्भात, विनोद तावडे यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा झाली असून, पाठ्यपुस्तक मंडळाकडे लवकरच हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून कायमच जनकल्याण आणि लोकसेवेचा ध्यास घेतला. मोफत आणि सक्तीचे शिक्षण, ग्रंथालयांना प्रोत्साहन, कलांना राजाश्रय, जनतेचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर त्यांनी कायम लक्ष केंद्रित केले. इतिहास, राजकारण, कला अशा विविधांगी विषयांवर त्यांनी जगभरातील अनेक जाणकारांशी पत्रव्यवहार केला. विविध परिषदांमधील भाषणांमधून त्यांनी आपल्या दूरदृष्टीचे दर्शन घडवले. शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, तसेच पुणे, नांदेड, अमरावती विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्यात आला आहे; मात्र हा आढावा चरित्रात्मक स्वरूपाचा आहे. सयाजीरावांची भाषणे आणि पत्रव्यवहार विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. त्यादृष्टीने हा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे मत महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधन समितीचे सचिव बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.सयाजीराव थोडक्यात समजून घेता येणारमहाराज सयाजीराव गायकवाड यांचा जीवनप्रवास आणि कर्तृत्व २५ खंडांमधून शब्दबद्ध करण्याचे शिवधनुष्य चरित्र साधन समितीने पेलले आहे. सामान्यांना सयाजीराव थोडक्यात समजून घेता यावेत, यासाठी ३२ पानांची छोटी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.ही पुस्तिका हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय पुढील वर्षभरामध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा चार ठिकाणी दोन दिवसीय परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे.मालेगावपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले कवळाणे हे महाराज सयाजीरावांचे जन्मगाव. ११ मार्च रोजी सयाजीरावांची १५६ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त शासकीय समितीतर्फे पाच पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. यामध्ये युगद्रष्टा, महाराष्ट्राचे शिल्पकार सयाजीराव अशा पुस्तकांचा समावेश आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये २५ खंडांचे प्रकाशन चरित्र साधन समितीतर्फे केले जाणार आहे.सयाजीराव यांच्या नावे शासनामार्फत ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात प्रकाशित झालेल्या १२ खंडांचा हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. यामध्ये भाषण, गौरवगाथा, पत्रव्यवहार, स्वातंत्र्ययोद्ध्यांचे पाठीराखे, प्रज्ञावंत सयाजीराव आदी खंडांचा समावेश आहे. डॉ. सुनीलकुमार लवाटे यांनी हिंदी अनुवादाचे काम पूर्णत्वास नेल्याचे भांड यांनी सांगितले.