शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सवाई महोत्सवातील स्वरानंद!

By admin | Updated: December 13, 2014 00:13 IST

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात स्वरानंद घेण्यासाठी पुणोकर मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. सूर, तालावर मंत्रमुग्ध होणा:या या सुरमयी पर्वणीतला अनुभव काही औरच!

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात स्वरानंद घेण्यासाठी पुणोकर मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. सूर, तालावर मंत्रमुग्ध होणा:या या सुरमयी पर्वणीतला अनुभव काही औरच!  अनेक गायकांच्या दज्रेदार गायनाने महोत्सवाने एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यातील काही विशेष क्षण..
 
मंगलमय सुंद्रीवादन
62व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम सादरीकरण करणारे भीमण्णा जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी महोत्सवाची सुरुवात अतिशय सुरेल आणि आनंददायी केली. सूरमणीप्राप्त भीमण्णा स्वरांमध्ये ईश्वर आहे, असे मानतात आणि वादनातून त्याची प्रचितीही आली. आपले वडील पं. चिदानंद जाधव आणि आजोबा सिदराम जाधव यांच्या संस्कारात वाढल्याने त्यांची लहान वयातच उत्तम तयारी झाली. त्यांनी राग भीमपलास गायकी अंगाने पेश केला. रागस्वरूप जपणो, तालात चूश्त अशी बंदिश (गत) मांडणो, पुकारबरोबरच रंजकतेचे भान ठेवणो इत्यादी वैशिष्टय़े त्यांच्या वादनात आढळली. स्वरांवर व ताललयीवर जेवढी हुकमत तेवढेच प्रेमही दिसून आले. शेवटी त्यांनी एक धून सादर करून वादन संपविले. या वाद्यावर तंतकारी वाजवण्याचा प्रय}ही चांगला होता. त्यांना तबल्यावर उत्तम साथ-ांगत पं. शांतिलिंग देसाई यांनी केली, तर सुंद्रीवादनाची साथ यशवंत जाधव यांनी केली. व्हायोलिनवर देवदत्त जोशी, तर तानपु:यावर पं. सातलिंगप्पा सायपल्लू यांनी साथ केली.
 
सानिया पाटणकर यांचे तयारीचे गायन
सुंद्रीवादनानंतर पुण्यातील तरुण-तडफदार गायिका सानिया पाटणकर या रंगमंचावर आल्या. अनेक तरुण कलाकारांचे या स्वरमंचावर गाण्याचे स्वप्न असते तसे सानियाचेही होते, ते साकार झाले. अशा रंगमंचावर गाण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी गंभीर व भक्तिरसप्रधान राग ‘श्री’ निवडला. कोमल रिषभाच्या लगावामुळे हा राग अंत:करण व्याकूळ करून टाकतो. प्रत्येक स्वराशी कोमल रिषभाचे नाते जणू अतूट असेच असते. परे, मरे, मपधमरे, पनिसारेनिधप अशा स्वरसंगतींनी रागरूप साकारले. त्यांची आवाजाची उत्तम देण, तिन्ही सप्तकांत सहज फिरणारा आवाज, दाणोदार व चपळतेने फिरणारी तान इ. वैशिष्टय़े सांगता येतील. गायनात ठेहरावाचे प्रमाण वाढले, तर गाणो हृदयस्पर्शी होऊ शकेल. गायनात, गुरू अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनशैलीची आठवण झाली. राग ‘श्री’मध्ये विलंबित त्रितालातील पारंपरिक ख्याल ‘कहॉँ मैं गुरु ढुंडन जाऊं’ सादर केला. मिश्रखमाजमधील टप्पा गायन विशेष दाद देऊन गेले. हा टप्पा संवादिनीवादक चैतन्य कुंठे यांनी बांधला आहे.‘रूप पाहता लोचनी’ या रूपाच्या अभंगाने रंगतीचा कळस अधिकच चढत गेला. तबलावादक अविनाश पाटील आणि संवादिनीवादक रोहित मराठे, तानपुरा साथ श्रुती अभ्यंकर, प्रीती सोहनी, सुगंधा उपासनी यांनी केली.
 
रंगतदार 
जुगलबंदी
जुगलबंदी म्हणजे युगुलगान. यालाच सहगायनही म्हणतात. फार कमी प्रमाणात ऐकायला आणि बघायला मिळते. या वर्षी प्रथमच युवा कलाकार दिवाकर आणि प्रभाकर कश्यप यांनी गायन सादर केले. राग ‘अमीर प्रिया’ सादर केला. राग मधुर आहे; परंतु रसिकांना हे नाव अपरिचित असल्याने तेवढे उत्साहाने स्वागत झाले नाही. हा उ. अमीर खॉँसाहेबांनी तयार केलेला राग असून, सा ग म प नि सा अशा स्वरूपात दाक्षिणात्य संगीतात जास्त प्रचलित आहे. यामध्ये विलंबित झपतालामध्ये ‘नंदकिशोर रंगरसिया’, तर ‘प्रीत रीत ना द्रुत  बंदिश तयारीने सादर केली. तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा आवाज, तानांची उत्तम तयारी, स्वर-तालावर हुकूमत, नोटेशन (सरगम)ची वैशिष्टपूर्ण मांडणी ही त्यांची जमेची बाजू होती. रसिकांना गायन आवडल्याने गाण्याचा आग्रहही झाला. परंतु. वेळेअभावी गायन थांबवावे लागले.लहार्मोनियम साथ संतोष घंटे यांनी गायनास पोषक अशी केली. या दोघांच्या सुसंगतीमुळे गायन अधिकाधिक रंगत केले.
 
चैतन्यमय संतूरवादन
प. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याच्या माध्यमातून संगीत परंपरा अतिशय समृद्ध केली आहे. संतूर म्हटले की पंडितजी आणि पंडितजी म्हटले की संतूर, असा जगभर असलेला मानसन्मान या वाद्याला पंडितजींनी मिळवून दिला आहे. सवाई महोत्सवात प्रत्येक वर्षी रसिक त्यांचे सूर ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. याही वर्षीह त्यांनी सर्वाच्या आवडीचा राग चारूकेशी सादर केला. हमखास रंगणा:या या रागामध्ये त्यांनी संथ आलाप, जोड आणि झाला सादर केला. जो की, ध्रुपद-धमार शैलीतून आलेला आहे. ध नि सा रे ग रे, ग रे नि ध ध ग रे ग सा, ध नि सा ध प, म ग रे ग सा, (म) सा ध नि ध सा अशा आकर्षन स्वरसंगतींनी रागरूपाने माहोल उभा केला. रूपक तालातील गातीने राग रंगत गेला आणि द्रुत व अति द्रुत लयीतील गतीने रसिक मंत्रमुग्ध झाले. पं. विजय घाटे यांनी अप्रतिम तबला संगत केली. पंडितजींच्या वादनाला कधी हळुवार, तर कधी जोरकस असे संवाद करत कार्यक्रमाला तेजदार बनवले. पंडितजींना तानपुरा साथ त्यांचे पट्टशिष्य दिलीप काळे यांनी केली. पंडितजींनी मिश्र पहाडी धून वाजवून वादनाला विराम दिला.
 
संगीतमरतड पं. जसराज यांच्या शिष्यांची मैफल 
गेली काही दशके पं. जसराज यांनी आपल्या गायकीने रसिकांना वेड लावले. गोड आवाज, मधुर गायनशैली, तिन्ही सप्तकांतील अदाकारी, रंगदार सरगम. सर्व काही अलौकिक व अभिजातही. अशा गायनाची आतुरतेने वाट बघाणारे रसिक काहिसे नाराज झाले; परंतु पंडिजींचे दर्शन होणो हेही काही कमी नाही. निसर्गापुढे माणूस काहीच नाही. पंडिजींना प्रकृती-अस्वास्थ्य. त्यामुळे गाता येत नाही, याचा त्रस आपल्यापेक्षा त्यांना जास्त होत असावा म्हणून ते बोलूनही गेले, की आता नवीन गायकांनी पुढे येऊन परंपरा वाढवावी किंवा कायम तरी ठेवावी. पंडितजींनी असा इतिहास घडवला आहे, की त्यांच्या संवादातूनही (बोलवण्याच्या) मैफल रंगत गेली.पंडितजींनी अजरामर केलेल्या बंदिशीचे सादरीकरण रसिकांसाठी मेजवानी ठरली. ‘अल्ला मेहरबान जोरी बाजे कोई नहीं है अपना। या बंदिशीचे गायन तृप्ती मुखर्जी, प्रीतम भट्टाचार्य यांनी अतिशय नजाकतीने सादर केले. या कलाकारांना उत्तम आवाजाची देण लाभली आहे. परंपरा, समज, तानेची फिरतही उत्तम आहे. पं. रतन मोहन शर्मा यांनी तराना सादरीकरण केले. तराना गायकी, उपज ख्यालापेक्षा वेगळी असते त्याचे दर्शन घडविले. या रंगलेल्या मैफलीची सांगता ‘गुरु की महिमा’ या भजनाने झाली. या मैफलीला उत्तम साथसंगत तबला- राजकुमार शर्मा, तर संवादिनी- मुकुंद पेटकर यांनी केली.