शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बालगंधर्वांचा वारसा जतन करावा

By admin | Updated: July 17, 2017 04:29 IST

बालगंधर्वांनी प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यांनी रसिकांना जे सांस्कृतिक दर्शन घडविले आहे, त्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बालगंधर्वांनी प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यांनी रसिकांना जे सांस्कृतिक दर्शन घडविले आहे, त्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही. त्या वेळी तंत्रज्ञान नसल्याने त्यांच्या कलाकृती सर्वदूर पोहोचल्या नाहीत. आता हा वारसा जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी व्यक्त केले.बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे वितरण प्रभू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित यांना यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांना देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमात इतर पुरस्कारांमध्ये या वर्षीचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याच्या अप्पा बाबलो गावकर, तर डॉ. सावळो केणी पुरस्कार डोंबीवलीच्या धनंजय पुराणिक यांना देण्यात आला. गोविंद बल्लाळ पुरस्काराने मुंबईच्या शुभदा दादरकर, काकासाहेब खाडिलकर पुरस्कारने पुण्याच्या कविता टिकेकर, खाऊवाले पाटणकर पुरस्काराने गोव्याच्या राया कोरगावकर, रंगसेवा पुरस्काराने पुण्याचे सयाजी शेंडकर आणि गोव्याचे लक्ष्मण म्हाम्बरे यांना गौरविण्यात आले. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे, या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, द. कृ. लेले पुरस्काराने उल्हास केंजळे, बाल कलाकार निर्झरी चिंचाळकर आणि कार्तिकी भालेराव यांना सन्मानित करण्यात आले. यंदाच्या महाराष्ट्र राय संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमाकांच्या विजेत्या राधाकृष्ण कलामंदिर या संस्थेलाही या वेळी गौरविण्यात आले. या वेळी प्रभू यांच्या हस्ते ‘गंधर्वरंग’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. पणशीकर यांनीही पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. साखवळकर यांनी प्रास्ताविक केले.अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन, तर अवंती बायस यांनी आभार मानले.