शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सरपंचपद गुलदस्त्यात असल्याने ‘पॅनल’चा खर्च कोणी उचलायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या निर्णयामुळे सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर निघणार आहे. यामुळे गावांचा सरपंच कोण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाच्या निर्णयामुळे सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर निघणार आहे. यामुळे गावांचा सरपंच कोण होणार हे गुलदस्त्यात असल्याने पॅनलचा खर्च कोणा उचलणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पॅनलचे चांगलेच वांदे झाले आहेत.

आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच गावागावांत राजकीय घडामोडींना सुरुवात झाली होती. सरपंच होण्यासाठी अनेक इच्छुक घोड्यावर बसले होते. पॅनलची तयारी करून सरपंच पदासाठी होऊ दे खर्च म्हणत कामाला देखील लागले होते. परंतु, शासनाने आरक्षण सोडत रद्द केली. आता ती ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर काढली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील घोडेबाजार थांबलाच. परंतु, पैशाच्या उधळपट्टीला देखील लगाम बसणार आहे.

सध्या निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीसाठी पॅनलच्या रोज बैठका सुरू आहेत. राजकीय तडजोड म्हणून काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न होताना दिसतात. सरपंच आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुकीत सरपंच पदासाठी शड्डू ठोकून खर्चाचे आकडे जाहीर करणारे उमेदवार गाशा गुंडाळला आहे. निवडणुकीत पॅनल साठी खर्च करून पण सरपंच आहोत याची खात्री नसल्याने अनेकांनी खर्चातून माघार घेतली आहे. त्याचा मोठा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. सध्या गाव पातळीवर पॅनलची जुळवाजुळव केली जात असली तरी अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खर्चासाठी थेट तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांकडे मदतीचा आग्रह धरला आहे.