शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘समरकॅम्प’चा धंदा आला तेजीत

By admin | Updated: May 4, 2017 02:33 IST

सध्या शाळांना सुट्या पडल्या आहेत. मुले नेहमीच्या अभ्यासाच्या ‘कटकटी’मधून बाहेर पडून निवांत आहेत. परंतु, शालेय अभ्यासातून

रावेत : सध्या शाळांना सुट्या पडल्या आहेत. मुले नेहमीच्या अभ्यासाच्या ‘कटकटी’मधून बाहेर पडून निवांत आहेत. परंतु, शालेय अभ्यासातून सुटका झालेल्या मुलांना सर्वच क्षेत्रात ‘सर्वज्ञ’ करण्याच्या पालकांच्या हट्टापायी विविध शिबिरांची वाट धरावी लागत आहे. आपला पाल्य कोणत्याही बाबतीत मागे राहू नये, असा अट्टहास धरून हजारो रुपयाची गुंतवणूक करून पालक आपल्या पाल्याला समर कॅम्पच्या दारात नेऊन सोडत आहेत. यातून समर कॅम्पचालकांचा धंदा जोरात असून, एकेकाळी संस्कार शिबिराच्या नावे सुरू झालेल्या या उपक्रमाचे रूपांतर मोठ्या उद्योगात झाले आहे. आपल्या पाल्यावर संस्कार घडविण्याऱ्या या कॅम्पबद्दल तितकेच जागृत असण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या म्हणजे मुलांना वेध लागायचे ते मामा, काका, मावशीच्या गावाला जाण्याचे. वर्षभराच्या अभ्यासामुळे आलेला शिणवटा घालण्यासाठी मुलांची पावले साहजिकच गावाकडे वळायची. मात्र अलीकडच्या आधुनिकतेची झालर लावलेल्या काळात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे निष्पाप मुलांचे खेळण्या-बागडण्याचे दिवस संपून गेले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ली मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नसल्याने समर कॅम्पवाल्यांचे फावते आहे. यामुळे शहरात गल्लोगल्ली समर कॅम्पचे फलक लागलेले दिसून येत आहेत.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते. याचा सर्वसाधारण अर्थ लहानपणी केलेल्या संस्कारातूनच त्याचे भवितव्य घडत असते. यासाठी लहान वयात संस्कार घडविण्याचे काम करण्यात येते. या समजुतीतून २५-३० वर्षांपूर्वी संस्कार शिबिराचा उदय झाला. लहान मुलांवर शहाणपणाच्या चार गोष्टी शिकविण्याचे, त्यांच्यावर साहस, कला, वैयक्तिक आवडी-निवडी, छंद यांची जोपासना करण्याचे काम करण्यात येत असे. यामुळे शहरातील काही मोजक्या पालकांकडून प्रतिसाद लाभत असे. त्यानंतर मात्र या संकल्पनेत झपाट्याने बदल झाला. सुरुवातीला सेवाभावी उपक्रम म्हणून सुरु केलेल्या उपक्रमाचे उद्दिष्ट बदलत गेले. यातून पैसा कमाविण्याची सुपीक आयडिया संचालकांच्या मनात आली. अशा शिबिरांसाठी पालकांना आपला खिसा रिकामा करावा लागतो. काही वर्षांपूर्वी उन्हाळी शिबिर म्हटले, की चित्रकला, हस्तकला, पोहणे, विविध खेळ, अभिनय, श्लोकपठण, पाठांतर यावर भर दिला जायचा. विशेषत: अभिनय, चित्रकला, नृत्य या प्रकारांना हमखास प्रतिसाद लाभायचा. साहसी प्रकारात जंगल भटकंती विशेष ठरायची. शहरातील मुलांना निसर्ग, वन्यप्राणी, नदी, नाले, वृक्षराजी साद घालायची. काही ठराविक रक्कमेत अथवा काही सामाजिक संघटनाकडून शिबिरांचे आयोजन केले जात असे. आताच्या संगणकीय आणि मोबाइलच्या पिढीतल्या मुलांच्या आवडीनिवडीचे प्रतिबिंब या शिबिरामध्ये पाहायला मिळू लागलेय. नेहमीच्या ठरावीक शिबिरांबरोबरच करिअरविषयक आणि तंत्रज्ञानविषयक कार्यशाळांना पाठविण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. इंग्लिश स्पीकिंग, कॉम्युटरसारख्या विषयावर वाहिलेल्या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. काही शिबिरे ही निवासी असतात. यासाठी हजारो रुपयांपर्यंत फी आकारण्यात येते. काही ठिकाणी भपकेबाजी करुन वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन सुरू करण्यात येणाऱ्या शिबिरांतून चांगला अनुभव येतोच, असे नाही. यासाठी पालकांनी सतर्क राहूनच शिबिरांची निवड करणे सोयीस्कर ठरते. (वार्ताहर)तणावमुक्तीसाठी...शाळेच्या धाकामुळे झोप न होणाऱ्या पोरांना सकाळी उशिरापर्यंत निवांत झोपू द्या.मुलांना स्वत:जवळून निदान दोन महिने तरी दूर करू नका.त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करा.जुन्या-पुरान्या पुस्तकांतूून कात्रीने चित्र कापू द्या.१५ दिवसांत २००० खर्च करण्यापेक्षा २०० रुपयांचे कोरे कागद, ओतीव कागद, रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले आणून त्यांच्या पुढ्यात टाका.घरी बिनधास्त उड्या मारू द्या. खोड्या करू द्या. मामाचे, मावशीचे गाव लोप पावले असले, तरी चार दिवस अवश्य जाऊ द्या.रात्री घराच्या गच्चीवरच का असेना, अंथरूण टाकून रात्रीचे चांदणे न्याहाळू द्या. वर्षानुवर्षे लागणारा व्यक्तिमत्त्व विकास अवघ्या १५ दिवसांतच होणार का?सुरुवातीपासूनच कच्चे असलेले गणित १५ दिवसांतच पक्के होणार का ?वेदपठण, नृत्य हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसांतच मुलांना यात पांडित्य प्राप्त होईल का?पाठ आणि पोट एकच झालेल्या पोरांना भर उन्हात पाठवून आणखी कुपोषित करणार का ? या प्रश्नांचा विचार पालकांनी करावा.