शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शहरात ‘समरकॅम्प’चा धंदा आला तेजीत

By admin | Updated: May 4, 2017 02:33 IST

सध्या शाळांना सुट्या पडल्या आहेत. मुले नेहमीच्या अभ्यासाच्या ‘कटकटी’मधून बाहेर पडून निवांत आहेत. परंतु, शालेय अभ्यासातून

रावेत : सध्या शाळांना सुट्या पडल्या आहेत. मुले नेहमीच्या अभ्यासाच्या ‘कटकटी’मधून बाहेर पडून निवांत आहेत. परंतु, शालेय अभ्यासातून सुटका झालेल्या मुलांना सर्वच क्षेत्रात ‘सर्वज्ञ’ करण्याच्या पालकांच्या हट्टापायी विविध शिबिरांची वाट धरावी लागत आहे. आपला पाल्य कोणत्याही बाबतीत मागे राहू नये, असा अट्टहास धरून हजारो रुपयाची गुंतवणूक करून पालक आपल्या पाल्याला समर कॅम्पच्या दारात नेऊन सोडत आहेत. यातून समर कॅम्पचालकांचा धंदा जोरात असून, एकेकाळी संस्कार शिबिराच्या नावे सुरू झालेल्या या उपक्रमाचे रूपांतर मोठ्या उद्योगात झाले आहे. आपल्या पाल्यावर संस्कार घडविण्याऱ्या या कॅम्पबद्दल तितकेच जागृत असण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या म्हणजे मुलांना वेध लागायचे ते मामा, काका, मावशीच्या गावाला जाण्याचे. वर्षभराच्या अभ्यासामुळे आलेला शिणवटा घालण्यासाठी मुलांची पावले साहजिकच गावाकडे वळायची. मात्र अलीकडच्या आधुनिकतेची झालर लावलेल्या काळात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे निष्पाप मुलांचे खेळण्या-बागडण्याचे दिवस संपून गेले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ली मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नसल्याने समर कॅम्पवाल्यांचे फावते आहे. यामुळे शहरात गल्लोगल्ली समर कॅम्पचे फलक लागलेले दिसून येत आहेत.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते. याचा सर्वसाधारण अर्थ लहानपणी केलेल्या संस्कारातूनच त्याचे भवितव्य घडत असते. यासाठी लहान वयात संस्कार घडविण्याचे काम करण्यात येते. या समजुतीतून २५-३० वर्षांपूर्वी संस्कार शिबिराचा उदय झाला. लहान मुलांवर शहाणपणाच्या चार गोष्टी शिकविण्याचे, त्यांच्यावर साहस, कला, वैयक्तिक आवडी-निवडी, छंद यांची जोपासना करण्याचे काम करण्यात येत असे. यामुळे शहरातील काही मोजक्या पालकांकडून प्रतिसाद लाभत असे. त्यानंतर मात्र या संकल्पनेत झपाट्याने बदल झाला. सुरुवातीला सेवाभावी उपक्रम म्हणून सुरु केलेल्या उपक्रमाचे उद्दिष्ट बदलत गेले. यातून पैसा कमाविण्याची सुपीक आयडिया संचालकांच्या मनात आली. अशा शिबिरांसाठी पालकांना आपला खिसा रिकामा करावा लागतो. काही वर्षांपूर्वी उन्हाळी शिबिर म्हटले, की चित्रकला, हस्तकला, पोहणे, विविध खेळ, अभिनय, श्लोकपठण, पाठांतर यावर भर दिला जायचा. विशेषत: अभिनय, चित्रकला, नृत्य या प्रकारांना हमखास प्रतिसाद लाभायचा. साहसी प्रकारात जंगल भटकंती विशेष ठरायची. शहरातील मुलांना निसर्ग, वन्यप्राणी, नदी, नाले, वृक्षराजी साद घालायची. काही ठराविक रक्कमेत अथवा काही सामाजिक संघटनाकडून शिबिरांचे आयोजन केले जात असे. आताच्या संगणकीय आणि मोबाइलच्या पिढीतल्या मुलांच्या आवडीनिवडीचे प्रतिबिंब या शिबिरामध्ये पाहायला मिळू लागलेय. नेहमीच्या ठरावीक शिबिरांबरोबरच करिअरविषयक आणि तंत्रज्ञानविषयक कार्यशाळांना पाठविण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. इंग्लिश स्पीकिंग, कॉम्युटरसारख्या विषयावर वाहिलेल्या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. काही शिबिरे ही निवासी असतात. यासाठी हजारो रुपयांपर्यंत फी आकारण्यात येते. काही ठिकाणी भपकेबाजी करुन वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन सुरू करण्यात येणाऱ्या शिबिरांतून चांगला अनुभव येतोच, असे नाही. यासाठी पालकांनी सतर्क राहूनच शिबिरांची निवड करणे सोयीस्कर ठरते. (वार्ताहर)तणावमुक्तीसाठी...शाळेच्या धाकामुळे झोप न होणाऱ्या पोरांना सकाळी उशिरापर्यंत निवांत झोपू द्या.मुलांना स्वत:जवळून निदान दोन महिने तरी दूर करू नका.त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करा.जुन्या-पुरान्या पुस्तकांतूून कात्रीने चित्र कापू द्या.१५ दिवसांत २००० खर्च करण्यापेक्षा २०० रुपयांचे कोरे कागद, ओतीव कागद, रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले आणून त्यांच्या पुढ्यात टाका.घरी बिनधास्त उड्या मारू द्या. खोड्या करू द्या. मामाचे, मावशीचे गाव लोप पावले असले, तरी चार दिवस अवश्य जाऊ द्या.रात्री घराच्या गच्चीवरच का असेना, अंथरूण टाकून रात्रीचे चांदणे न्याहाळू द्या. वर्षानुवर्षे लागणारा व्यक्तिमत्त्व विकास अवघ्या १५ दिवसांतच होणार का?सुरुवातीपासूनच कच्चे असलेले गणित १५ दिवसांतच पक्के होणार का ?वेदपठण, नृत्य हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसांतच मुलांना यात पांडित्य प्राप्त होईल का?पाठ आणि पोट एकच झालेल्या पोरांना भर उन्हात पाठवून आणखी कुपोषित करणार का ? या प्रश्नांचा विचार पालकांनी करावा.