शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:13 IST

बारामतीच्या मार्केट यार्डामध्ये शुकशुकाट : लिलाव बंद असल्याने व्यवहार ठप्प

बारामती : शहरातील अडत व्यापाऱ्यांनी शेतकºयांच्या मालाची खरेदी-विक्री दोन दिवसांपासून बंद केली आहे. हे व्यवहार बंद असल्याने नेहमी गजबजलेल्या मार्केट यार्डात मंगळवारी शुकशुकाट होता. येथील अडत व्यापाºयांनी सरकारच्या जाचक अटींच्या विरोधात बंद पुकारल्याने मार्केट यार्डात शुकशुकाट होता. व्यापाºयांनी शेतकºयांचा मालाची खरेदी-विक्री बंद ठेवली आहे. तसेच, शेतकºयांनी त्यांचा माल अडतीवर आणू नये, असे आवाहन केले आहे.

माल मार्केटमध्ये येऊन पडल्यास पावसाचे दिवस असल्याने मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पण, या सगळ्याकडे सरकार मुद्दाम डोळेझाक करीत आहे. पणन खात्याकडून वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचे चित्र आहे. सध्या मका, सोयाबीन, तूर, सूर्यफूल, शेंगा, हरभरा, गहू यांचे लिलाव बंद असल्याने मार्केटमध्ये अगदी कमी प्रमाणात वर्दळ दिसत होती.पण, आता व्यापारी शेतकºयांचा माल घेत नसल्याने ते उचल देत नाहीत. माल असूनदेखील शेतकºयांना तो विकता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मार्केट यार्डात ३० ते ३५ आडत व्यापारी आहेत. या सगळ्या व्यापाºयांनी शेतकºयांची मालाची खरेदी-विक्री बंद केली आहे. तसेच या बंदमुळे हातावरचे पोट असणाºया लोकांचीपण अडचण होत आहे. भाड्याने गाडी चालवणारे वाहनचालक, हमाल, काटा करणारे, कामगार यांनादेखील काम नाही, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महावीर शहा वडूजकर, मिलिंद सालपे, प्रताप सातव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गुळाला हमीभाव नसल्याने गुळाचे लिलाव सुरू आहेत. हमीभावाच्या नावाखाली शेतकºयांना खूष करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत, असे व्यापाºयांनी सांगितले. या संपाला नगर येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यापाºयांना पाठिंबा दर्शविला आहे.सरकारने कायदा करताना त्यासाठीच्या तरतुदी करणे आवश्यक आहे. पुरेशी गोदामे बांधणे, त्याचप्रमाणे शेतकºयांचा सगळा माल हमीभावात खरेदी करणे, १० क्विंटलची आवक झाली तर सरकार फक्त ३ क्विंटल चांगल्या दर्जाचा माल खरेदी करते. राहिलेला ७ क्विंटल माल हा व्यापारी घेतात; मग मालाची प्रतवारी करून त्याची विक्री ते करतात. यात व्यापाºयाला नुकसानदेखील होऊ शकते.४व्यापारी शेतकºयांना रोख पैसे देतात; पण सरकारकडून पैसे मिळायला ४ ते ५ महिने लागतात. शेतकºयांना गरज लागल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी किंवा लग्नासाठी, त्यांच्या अडीअडचणीला व्यापारी उचल देत होते.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती