शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्समध्ये १९ महिन्यांनंतर वेतनवाढ करार

By admin | Updated: March 29, 2017 02:23 IST

टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ करार मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर मार्गी

पिंपरी : येथील टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ करार मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर मार्गी लागला. त्रैवार्षिक पद्धतीने हा करार झाला असून, कामगारांचा पाडवा अधिकच गोड झाला. कंपनीतील कामगारांनी भंडाऱ्याची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. हा वेतनवाढ करार १९ महिने प्रलंबित होता. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीकरिता ८६०० प्रत्यक्ष वाढ ही तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून तसेच ८७०० रुपये अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७ हजार ३०० एवढ्या रकमेचा हा करार झाला. या पगारवाढी व्यतिरिक्त कंपनीने कंपनीच्या सेवेत असताना एखादा कामगार मृत पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटी बाबत, २५ वर्षसेवा काल पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येणार आहे. या वाढीबरोबरच कामगारांना देण्यात येणारया इतरही सेवा सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्लॉक क्लोजरच्या दिवसांमध्येही सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. क्वालिटी विभागाचे कार्यकारी संचालक व टाटा मोटर्सच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य सतिश बोरवणकर यांनी कराराबाबतची युनियनबरोबर चर्चा करून करार मार्गी लावला. कामगार व युनियनसोबत कंपनीचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असल्याचे बोरवणकर त्यांनी यावेळी नमूद केले. कामगारांनी जवळजवळ १९ महिने शांततेच्या मार्गावर राहिल्याबद्दल कौतुक केले व युनियनने चांगल्या मार्गाचा अवलंब करून कामगारांना जास्तीत जास्त फायदा करून दिल्याचा उल्लेख केला. टाटा संस्कृती आपण सर्वांनीच अशाच प्रकारे जपली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यवस्थापनाकडून प्लांट हेड संगमनाथ दिग्गे, एचआर हेड संजय वर्मा, डेव्हलपमेंट-ईआरसीचे जनरल मॅनेजर नंदगोपाल वैद्य, शेअर्ड सर्व्हिसेचे हेड रविंद्र पेठे, रमेश अय्यर, पद्माकर कुलकर्णी, विलास गोडसे आदी उपस्थित होते. तर युनियनच्यावतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष संजय काळे, सरचिटणीस सुरेश जासूद, खजिनदार यशवंत चव्हाण, उपाध्यक्ष कमलाकर ढमढेरे, सहसचिव रमेश गारडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कामगार लढ्याला आले यशटाटा मोटर्स कंपनीचा वेतनवाढ करार १ सप्टेंबर २०१५ पासून रखडला होता. कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनमध्ये करारासंदर्भात अनेक बैठका फिसकटल्या होत्या. वेतनवाढ करार तीन वर्षांसाठीचा असावा, अशी युनियनची प्रमुख मागणी होती. बैठका घेऊनही तोडगा निघत नसल्याने कामगारांनी १७ मार्चला कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. तसेच जेवणावरही बहिष्कार घातला होता. दरम्यान, २० मार्चला टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्र्रशेखरन यांनी टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यासह प्रलंबित वेतनकरार लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतर काही अवघ्या आठवड्याभरातच प्रश्न मार्गी लागल्याने कामगारवर्गात आनंदाचे वातावरण आहे.