शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

टाटा मोटर्समध्ये १९ महिन्यांनंतर वेतनवाढ करार

By admin | Updated: March 29, 2017 02:23 IST

टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ करार मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर मार्गी

पिंपरी : येथील टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ करार मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर मार्गी लागला. त्रैवार्षिक पद्धतीने हा करार झाला असून, कामगारांचा पाडवा अधिकच गोड झाला. कंपनीतील कामगारांनी भंडाऱ्याची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. हा वेतनवाढ करार १९ महिने प्रलंबित होता. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीकरिता ८६०० प्रत्यक्ष वाढ ही तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून तसेच ८७०० रुपये अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७ हजार ३०० एवढ्या रकमेचा हा करार झाला. या पगारवाढी व्यतिरिक्त कंपनीने कंपनीच्या सेवेत असताना एखादा कामगार मृत पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटी बाबत, २५ वर्षसेवा काल पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येणार आहे. या वाढीबरोबरच कामगारांना देण्यात येणारया इतरही सेवा सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्लॉक क्लोजरच्या दिवसांमध्येही सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. क्वालिटी विभागाचे कार्यकारी संचालक व टाटा मोटर्सच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य सतिश बोरवणकर यांनी कराराबाबतची युनियनबरोबर चर्चा करून करार मार्गी लावला. कामगार व युनियनसोबत कंपनीचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असल्याचे बोरवणकर त्यांनी यावेळी नमूद केले. कामगारांनी जवळजवळ १९ महिने शांततेच्या मार्गावर राहिल्याबद्दल कौतुक केले व युनियनने चांगल्या मार्गाचा अवलंब करून कामगारांना जास्तीत जास्त फायदा करून दिल्याचा उल्लेख केला. टाटा संस्कृती आपण सर्वांनीच अशाच प्रकारे जपली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यवस्थापनाकडून प्लांट हेड संगमनाथ दिग्गे, एचआर हेड संजय वर्मा, डेव्हलपमेंट-ईआरसीचे जनरल मॅनेजर नंदगोपाल वैद्य, शेअर्ड सर्व्हिसेचे हेड रविंद्र पेठे, रमेश अय्यर, पद्माकर कुलकर्णी, विलास गोडसे आदी उपस्थित होते. तर युनियनच्यावतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष संजय काळे, सरचिटणीस सुरेश जासूद, खजिनदार यशवंत चव्हाण, उपाध्यक्ष कमलाकर ढमढेरे, सहसचिव रमेश गारडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कामगार लढ्याला आले यशटाटा मोटर्स कंपनीचा वेतनवाढ करार १ सप्टेंबर २०१५ पासून रखडला होता. कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनमध्ये करारासंदर्भात अनेक बैठका फिसकटल्या होत्या. वेतनवाढ करार तीन वर्षांसाठीचा असावा, अशी युनियनची प्रमुख मागणी होती. बैठका घेऊनही तोडगा निघत नसल्याने कामगारांनी १७ मार्चला कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. तसेच जेवणावरही बहिष्कार घातला होता. दरम्यान, २० मार्चला टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्र्रशेखरन यांनी टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यासह प्रलंबित वेतनकरार लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतर काही अवघ्या आठवड्याभरातच प्रश्न मार्गी लागल्याने कामगारवर्गात आनंदाचे वातावरण आहे.