शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:08 IST

चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे.

विशाल दरगुडे चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे. प्रत्येक विभागाकडून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात वीज वितरण विभाग अग्रेसर आहे. कारण या भागात वीज वितरण विभागाच्या ‘हाय व्होल्टेज’च्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. साईनाथनगर परिसरात सर्वत्र फक्त ताराच तारा दिसतात. त्यामुळे येथे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी पूर्वीपासून इमारती आहेत, त्या इमारतींच्या गॅलरीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.वीजखांबामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येतात. या तारा भूमिगत करणे गरजेचे असून,तसे झाल्यास या भागाचा खूपगंभीर अन् धोकादायक प्रश्न मार्गी लागून या भागाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.> मिरवणूक मार्गात अडसरसाईनाथनगर येथून वडगावशेरीतील विविध मिरवणुका साईनाथनगर मुख्य चौकातूनच नदीकाठी जातात. येथून निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक वडगावशेरी, चंदननगरमधील नागरिकांचे मुख्य आकर्षण आहे. या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना हातात काठी घेऊन विजेच्या तारा हटविण्याचे काम करावे लागते.दरवर्षी मिरवणुकीतील चित्ररथामुळे वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील अंधारात पडतो. या भागातील भूमिगत वीजतारा करण्याची जुनी मागणी आहे.>दिवसाला येतात तीन ते चार कॉलशहरातील विविध भागांतून विविध घटनांसंदर्भातील तीन ते चार कॉल येतात. वर्षाची ही संख्या हजाराच्या वर आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात आगीचे कॉल अधिक येतात. कॉलच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे.>विजेचा लपंडाव-येथील परिसरातील विजेच्या तारा अगदी खाली असल्याने पतंगाचा मांजा, मोठमोठ्या वाहनांच्या टपाला अडकून तार तुटून अपघात होतात. लहान-मोठा पाऊस पडला तरी विजेचा लपंडाव सुरू होतो. बºयाचदा दिवसभर वीज गायब असते. पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होते. हा त्रास नित्याचाच आहे.>राजकीय इच्छाशक्तीची गरज फक्त...साईनाथनगरचा विकास करणे सहज शक्य...साईनाथनगर परिसर वगळता वडगावशेरी असो किंवा खराडीचा भाग असो दोन्हींचा प्रचंड वेगाने विकास झालेला आहे. त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी त्यांच्या दोन वर्षांचा विकासनिधी या परिसराच्या विकासासाठी वापरल्यास साईनाथनगरचाही सर्वांगीण विकास दूर नाही... विकास होऊ शकतो फक्त त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज>साईनाथनगरमध्ये राहणे म्हणजे जीव वेशीवर टांगणे.साईनाथनगरमधील पसरलेले विजेच्या तारांचे जाळे हे जणू या परिसरातील नागरिकांचा जीवच वेशीवर टांगल्यासारखे असून, अतिशय धोकादायक परिसरात या भागातील नागरिक वास्तव्यास आहेत.> उघड्यावर तारासाईनाथनगर परिसर व जुना-मुंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर केबल पडल्या असून, त्या विजेच्या खांबाना लटकलेल्या आहेत. त्या रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे धोकादायक आहेत.> वीजतारांचे जाळेसाईनाथनगर चौक व अंतर्गत रस्त्यावरील सर्व साईनाथनगर मधील अंतर्गत भागात वीजखांबांना तारांचे जाळेच जागोजागी पसरलेले पाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे