शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:08 IST

चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे.

विशाल दरगुडे चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे. प्रत्येक विभागाकडून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात वीज वितरण विभाग अग्रेसर आहे. कारण या भागात वीज वितरण विभागाच्या ‘हाय व्होल्टेज’च्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. साईनाथनगर परिसरात सर्वत्र फक्त ताराच तारा दिसतात. त्यामुळे येथे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी पूर्वीपासून इमारती आहेत, त्या इमारतींच्या गॅलरीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.वीजखांबामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येतात. या तारा भूमिगत करणे गरजेचे असून,तसे झाल्यास या भागाचा खूपगंभीर अन् धोकादायक प्रश्न मार्गी लागून या भागाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.> मिरवणूक मार्गात अडसरसाईनाथनगर येथून वडगावशेरीतील विविध मिरवणुका साईनाथनगर मुख्य चौकातूनच नदीकाठी जातात. येथून निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक वडगावशेरी, चंदननगरमधील नागरिकांचे मुख्य आकर्षण आहे. या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना हातात काठी घेऊन विजेच्या तारा हटविण्याचे काम करावे लागते.दरवर्षी मिरवणुकीतील चित्ररथामुळे वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील अंधारात पडतो. या भागातील भूमिगत वीजतारा करण्याची जुनी मागणी आहे.>दिवसाला येतात तीन ते चार कॉलशहरातील विविध भागांतून विविध घटनांसंदर्भातील तीन ते चार कॉल येतात. वर्षाची ही संख्या हजाराच्या वर आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात आगीचे कॉल अधिक येतात. कॉलच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे.>विजेचा लपंडाव-येथील परिसरातील विजेच्या तारा अगदी खाली असल्याने पतंगाचा मांजा, मोठमोठ्या वाहनांच्या टपाला अडकून तार तुटून अपघात होतात. लहान-मोठा पाऊस पडला तरी विजेचा लपंडाव सुरू होतो. बºयाचदा दिवसभर वीज गायब असते. पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होते. हा त्रास नित्याचाच आहे.>राजकीय इच्छाशक्तीची गरज फक्त...साईनाथनगरचा विकास करणे सहज शक्य...साईनाथनगर परिसर वगळता वडगावशेरी असो किंवा खराडीचा भाग असो दोन्हींचा प्रचंड वेगाने विकास झालेला आहे. त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी त्यांच्या दोन वर्षांचा विकासनिधी या परिसराच्या विकासासाठी वापरल्यास साईनाथनगरचाही सर्वांगीण विकास दूर नाही... विकास होऊ शकतो फक्त त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज>साईनाथनगरमध्ये राहणे म्हणजे जीव वेशीवर टांगणे.साईनाथनगरमधील पसरलेले विजेच्या तारांचे जाळे हे जणू या परिसरातील नागरिकांचा जीवच वेशीवर टांगल्यासारखे असून, अतिशय धोकादायक परिसरात या भागातील नागरिक वास्तव्यास आहेत.> उघड्यावर तारासाईनाथनगर परिसर व जुना-मुंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर केबल पडल्या असून, त्या विजेच्या खांबाना लटकलेल्या आहेत. त्या रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे धोकादायक आहेत.> वीजतारांचे जाळेसाईनाथनगर चौक व अंतर्गत रस्त्यावरील सर्व साईनाथनगर मधील अंतर्गत भागात वीजखांबांना तारांचे जाळेच जागोजागी पसरलेले पाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे