शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

तारांच्या फासाने साईनाथनगरचा विकास ठप्प, विजेचा लपंडाव सुरू, महावितरणकडून दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:08 IST

चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे.

विशाल दरगुडे चंदननगर : शहराचा काही भाग झपाट्याने विकसित होत असताना साईनाथनगर परिसर मात्र त्या विकासातून अजून दूर आहे. प्रत्येक विभागाकडून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात वीज वितरण विभाग अग्रेसर आहे. कारण या भागात वीज वितरण विभागाच्या ‘हाय व्होल्टेज’च्या तारांचे मोठे जाळे पसरले आहे. साईनाथनगर परिसरात सर्वत्र फक्त ताराच तारा दिसतात. त्यामुळे येथे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी पूर्वीपासून इमारती आहेत, त्या इमारतींच्या गॅलरीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे.वीजखांबामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी येतात. या तारा भूमिगत करणे गरजेचे असून,तसे झाल्यास या भागाचा खूपगंभीर अन् धोकादायक प्रश्न मार्गी लागून या भागाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.> मिरवणूक मार्गात अडसरसाईनाथनगर येथून वडगावशेरीतील विविध मिरवणुका साईनाथनगर मुख्य चौकातूनच नदीकाठी जातात. येथून निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक वडगावशेरी, चंदननगरमधील नागरिकांचे मुख्य आकर्षण आहे. या मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना हातात काठी घेऊन विजेच्या तारा हटविण्याचे काम करावे लागते.दरवर्षी मिरवणुकीतील चित्ररथामुळे वीजपुरवठा खंडित होऊन परिसरातील अंधारात पडतो. या भागातील भूमिगत वीजतारा करण्याची जुनी मागणी आहे.>दिवसाला येतात तीन ते चार कॉलशहरातील विविध भागांतून विविध घटनांसंदर्भातील तीन ते चार कॉल येतात. वर्षाची ही संख्या हजाराच्या वर आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात आगीचे कॉल अधिक येतात. कॉलच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे.>विजेचा लपंडाव-येथील परिसरातील विजेच्या तारा अगदी खाली असल्याने पतंगाचा मांजा, मोठमोठ्या वाहनांच्या टपाला अडकून तार तुटून अपघात होतात. लहान-मोठा पाऊस पडला तरी विजेचा लपंडाव सुरू होतो. बºयाचदा दिवसभर वीज गायब असते. पथदिवे बंद असल्याने या ठिकाणी चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होते. हा त्रास नित्याचाच आहे.>राजकीय इच्छाशक्तीची गरज फक्त...साईनाथनगरचा विकास करणे सहज शक्य...साईनाथनगर परिसर वगळता वडगावशेरी असो किंवा खराडीचा भाग असो दोन्हींचा प्रचंड वेगाने विकास झालेला आहे. त्यामुळे या भागातील नगरसेवकांनी त्यांच्या दोन वर्षांचा विकासनिधी या परिसराच्या विकासासाठी वापरल्यास साईनाथनगरचाही सर्वांगीण विकास दूर नाही... विकास होऊ शकतो फक्त त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज>साईनाथनगरमध्ये राहणे म्हणजे जीव वेशीवर टांगणे.साईनाथनगरमधील पसरलेले विजेच्या तारांचे जाळे हे जणू या परिसरातील नागरिकांचा जीवच वेशीवर टांगल्यासारखे असून, अतिशय धोकादायक परिसरात या भागातील नागरिक वास्तव्यास आहेत.> उघड्यावर तारासाईनाथनगर परिसर व जुना-मुंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उघड्यावर केबल पडल्या असून, त्या विजेच्या खांबाना लटकलेल्या आहेत. त्या रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे धोकादायक आहेत.> वीजतारांचे जाळेसाईनाथनगर चौक व अंतर्गत रस्त्यावरील सर्व साईनाथनगर मधील अंतर्गत भागात वीजखांबांना तारांचे जाळेच जागोजागी पसरलेले पाहावयास मिळते.

टॅग्स :Puneपुणे