शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र हायजॅक! केंद्रांवर शहरी भागातीलच नागरिकांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:43 IST

ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठी नाराजी

ठळक मुद्देऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना अँपवर शहरी भागातील नागरीकांचेच लागतात नंबर

उरुळी कांचन: उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, वाडे बोल्हाई या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर शहरी भागातील नागरिकांनी ताबा मिळवल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑनलाईन नोंदणी करतांना अँपवर शहरी भागातील नागरिकांचेच नंबर लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. 

पूर्व हवेलीमधील चार लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरिकांना लस मिळणार नसेल. तर, वरील चारही लसीकरण केंद्रे ताबडतोब बंद करण्यात यावीत. अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्याकडे केली आहे. तसेच पुढील दोन दिवसात वरील चारही लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरिकांना लस उपलब्ध करुन न दिल्यास, आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 

याबाबत लोकमतशी बोलताना उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन म्हणाले, लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरीकांना लस मिळत नसल्याने नागरिक  संतप्त झालेले आहेत. एकीकडे लॉकडाऊन सुरु असताना, पुणे शहर, पिंपरी चिंचवड हद्दीतील नागरिक आमच्याकडे गर्दी करत आहेत. शहरी भागातील उच्च शिक्षित नागरिक अँपवर त्वरित माहिती भरत असल्याने, ग्रामींण भागातील नागरिकांना नाव नोंदवण्याची संधीच मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. यामुळे ग्रामींण भागातील भागातील नागरिकांना लस मिळावी यासाठी अँपमध्ये सुधारणा करावी अथवा ग्रामींण भागातील लसीकरण केंद्रे बंद करावीत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.             

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या