शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांमधून ग्रामीण, आदिवासी, दलित अभ्यासक्रम बंद व्हावेत : राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:55 IST

जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.

ठळक मुद्देसाहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने 'साहित्यिक कलावंत संमेलन'‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद

पुणे : जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत. कारण विद्यापीठात जाऊन विद्यार्थी तिथे जातच शिकतात आणि हे बाहेर पडणारे शिक्षित येडे पुन्हा समाजात जातवादच करीत राहतात, हा जो विरोधाभास आहे तोच खरा संघर्षाचा काळ आहे, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने १७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ याविषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे होते. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सहभाग घेतला.साहित्य मग ते कुठल्याही कालखंडातील असो ते आजही वाचले जाते. एकही असा मराठी माणूस सापडणार नाही त्याच्याकडे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी सापडणार नाही. मात्र किती लोकांनी ती वाचली हा खरा प्रश्न आहे? शासनाने महात्मा फुले यांचे समग्र ग्रंथ काही वर्षांपूर्वी १० रूपये किंमतीत विकले, ते घेण्यासाठी लोक अक्षरश: तुटून पडले. एवढे खंड जर विकले गेले असतील मग समाजात क्रांतीच व्हायला काय हरकत होती. आज शाहू-फुले आंबेडकर ही समाजात केवळ एक म्हण ठरली असून, त्याचा तुळीसारखा वापर होतो आहे असे सांगून ते पुढे म्हणाले १९८०च्या दशकानंतरच्या साहित्याचा आढावा घेतला तर त्या काळातील साहित्य हे फदफदे होते. साहित्यामध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आणि मूल्यवस्थेचा प्रभाव पाहायला मिळतो. मात्र व्याख्यानांमधून ही नावे उच्चारताना चोखंदळपणे विचार केला जातो. त्याकाळात या चळवळी एकीकडे स्वत: चा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होत्या तर दुसऱ्या बाजूला जात आणि धर्म अशी टोकाची कर्मठताही आली. साहित्य हे अशा जातीपातीत विभागले जाणे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. आज अशी स्थिती आहे की विद्यापीठं, पुरस्कार सोहळे, सत्कार समारंभ हे जातीयतेत बाटले गेले आहेत. कोणत्या जातीच्या उमेदवाराला किती मते पडतील हे जाहीरपणे लिहिले जात आहे. यातच सध्या मुस्लीम साहित्याची स्थिती पाहिली तर त्यांच्या साहित्यामध्ये मूल्यव्यवस्थेवर केलेले भाष्य वाचायला मिळत नाही. देशात अन्याय होणारी ही एकच जात आहे जी एका विचित्र कोंडीत सापडली आहे. केवळ धर्माच्या गोडगोष्टी ते साहित्यातून मांडत आहेत, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.इंदुमती जोंधळे म्हणाल्या, की साहित्य परिवर्तनाची व्याप्ती बहुआयामी आहे. अर्थपूर्ण छटा साहित्यामधून प्रतिबिंबित होत आहेत. लेखक हा संवेदनशील आणि विश्लेषक असावा लागतो. अर्थकारण, राजकारण, कृषी अभ्यासपूर्ण मांडणारी कलाकृती साहित्यात निर्माण झाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात बोलताना समाजाचे प्रतिबिंब साहित्यात दिसते, समाजाला साहित्यातून दूर केले तर असे साहित्य समाजात सरपटणारे झुरळ होईल, ज्याचा समाजाला काही उपयोग होणार नाही, असे उत्तम कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे