शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘अत्याचारमुक्त महाराष्ट्र’ लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 04:31 IST

अनुसूचित जाती-जमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि झालेल्या अत्याचारांची सत्यता पडताळून, त्यात तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी समाजकल्याण आयुक्तालयाने

पुणे : अनुसूचित जाती-जमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि झालेल्या अत्याचारांची सत्यता पडताळून, त्यात तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी समाजकल्याण आयुक्तालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीय अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना तयार केली आहे. ही योजना राज्यभर लागू करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे दाखल केला आहे. हा प्रस्ताव दाखल करून ९ महिने उलटले तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जनतेमध्ये नाराजीची भावना आहे. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचा मुहूर्त साधून हा प्रस्ताव मंजूर करून ती योजना राज्यात लागू करण्याची मागणी होत आहे.राज्यात जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. हे रोखण्याचे काम शासनस्तरावर होत असते. मात्र अनेकदा या घटनांवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. या घटना होण्यापासून रोखण्यासाठी आणि झालेल्या घटनांची सत्यता पडताळून त्याचा लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी धोरण निर्माण करण्याची गरज होती. त्यानुसार केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापण्याच्या सूचना राज्य शासनांना दिल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जातीय अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना निर्माण करण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी समजाकल्याण आयुक्तांकडे केली होती. त्याची पडताळणी करून आणि गरज पाहून समाजकल्याण आयुक्तांनी अशी समिती कशी स्थापन करता येईल, याचा अभ्यास केला आणि प्रत्येक महसुली उपविभागाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय शांतता व समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना जुलै २०१५ ला पाठविला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये पुन्हा हा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यास ९ महिने उलटले तरी काहीच निर्णय झालेला नाही.याबाबत राहुल डंबाळे म्हणाले, ‘‘जातीय अत्याचार रोखण्यासाठी अशी समिती स्थापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजकल्याण आयुक्तांकडून राज्य शासनाला प्रस्तावही गेलेला आहे. मात्र त्यावर अजून निर्णय झालेला नाही. डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मान्य करून ही योजना राज्यात तातडीने लागू करावी, अशी आमची मागणी आहे.’’महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जातीय अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना निर्माण करण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी समजाकल्याण आयुक्तांकडे केली होती. त्याची पडताळणी करून अभ्यास झालेला आहे.