शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

‘अत्याचारमुक्त महाराष्ट्र’ लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 04:31 IST

अनुसूचित जाती-जमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि झालेल्या अत्याचारांची सत्यता पडताळून, त्यात तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी समाजकल्याण आयुक्तालयाने

पुणे : अनुसूचित जाती-जमातींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि झालेल्या अत्याचारांची सत्यता पडताळून, त्यात तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी समाजकल्याण आयुक्तालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीय अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना तयार केली आहे. ही योजना राज्यभर लागू करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे दाखल केला आहे. हा प्रस्ताव दाखल करून ९ महिने उलटले तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जनतेमध्ये नाराजीची भावना आहे. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचा मुहूर्त साधून हा प्रस्ताव मंजूर करून ती योजना राज्यात लागू करण्याची मागणी होत आहे.राज्यात जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. हे रोखण्याचे काम शासनस्तरावर होत असते. मात्र अनेकदा या घटनांवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. या घटना होण्यापासून रोखण्यासाठी आणि झालेल्या घटनांची सत्यता पडताळून त्याचा लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी धोरण निर्माण करण्याची गरज होती. त्यानुसार केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापण्याच्या सूचना राज्य शासनांना दिल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जातीय अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना निर्माण करण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी समजाकल्याण आयुक्तांकडे केली होती. त्याची पडताळणी करून आणि गरज पाहून समाजकल्याण आयुक्तांनी अशी समिती कशी स्थापन करता येईल, याचा अभ्यास केला आणि प्रत्येक महसुली उपविभागाच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय शांतता व समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना जुलै २०१५ ला पाठविला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये पुन्हा हा प्रस्ताव दाखल करण्यात आला. त्यास ९ महिने उलटले तरी काहीच निर्णय झालेला नाही.याबाबत राहुल डंबाळे म्हणाले, ‘‘जातीय अत्याचार रोखण्यासाठी अशी समिती स्थापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजकल्याण आयुक्तांकडून राज्य शासनाला प्रस्तावही गेलेला आहे. मात्र त्यावर अजून निर्णय झालेला नाही. डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मान्य करून ही योजना राज्यात तातडीने लागू करावी, अशी आमची मागणी आहे.’’महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जातीय अत्याचारमुक्त महाराष्ट्र योजना निर्माण करण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी समजाकल्याण आयुक्तांकडे केली होती. त्याची पडताळणी करून अभ्यास झालेला आहे.