शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

ऊस कारखानदारीमधील साटेलोटे उत्पादकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST

(रविकिरण सासवडे) लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे ऊसपट्टा ढवळून निघू लागला आहे. मात्र, राजकारणाच्या ...

(रविकिरण सासवडे)

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे ऊसपट्टा ढवळून निघू लागला आहे. मात्र, राजकारणाच्या धामधुमीत ऊस उत्पादकांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे. ‘छत्रपती’ कारखान्याच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सक्षम उमेदवार’ नसल्याने अंग काढून घेतले. थोड्याबहुत फरकाने इंदापूर- बारामती तालुक्यातील आगामी साखर कारखाना निवडणुकीत हे चित्र असणार आहे. मात्र, ऊस कारखानदारीमधील हे साटेलोटे ऊस उत्पादकांच्या मुळावर आले आहे. निवडणुका सोडून इतर वेळी होणारा तोंडदेखला विरोध काय कामाचा, अशी भावना सभासदांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

इंदापूर- बारामती तालुक्यांमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. इंदापूरमधील सध्या ‘कर्मयोगी’ व काही दिवसांत ‘छत्रपती’ कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, तर बारामतीमध्ये ‘सोमेश्वर’च्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इंदापूर तालुक्यातील बीजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अगदी ठरल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सक्षम उमेदवार’ नसल्याचे कारण देत निवडणुकीतून अंग काढून घेतले. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्र्यांचा पराभव केला. त्या इंदापूर तालुक्यात एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला उमेदवार मिळू नयेत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, तसेच यानंतर होणाऱ्या ‘छत्रपती’ कारखान्याच्या निवडणुकीसाठी केलेले हे साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चादेखील सभासदांमध्ये सुरू झाली आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधील होऊ घातलेल्या एफआरपीच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती वाढत असताना केवळ आधारभूत किमतीसाठी होणारा आग्राह आणि त्याभोवती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेळले जाणारे राजकारण सभासदांना वेड्यात काढण्याचा प्रकार असल्याचेही या विषयातले जाणकार सांगत आहेत. स्थानिक रुसव्याफुगव्यांमध्ये तसेच फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याचीही चर्चा यानिमित्ताने ऊसपट्ट्यात सुरू झाली आहे.

--------------------------------

आम्हाला वाटले म्हणून आम्ही माघार घेतली...

कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीने घेतलेल्या माघारीबाबत माध्यमांनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, ‘तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला वाटले, आम्ही माघार घेतली. विषय संपला. आमच्यावर कुणाचे काय बंधन आहे का,’ अशा शब्दांत कर्मयोगीच्या निवडणुकीत रस नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले.

------------------------------

महाराष्ट्रातील २०० ते २५० घराणी सातत्याने आलटूनपालटून सत्तास्थानी आली आहेत. अगदी गावगाड्यापासून ते राज्यपातळीपर्यंत या साट्यालोट्याचे संदर्भ नवीन नाहीत. मुळात इंदापूर- बारामती या पट्ट्यामध्ये जे साखर कारखाने आहेत. ते सर्व साटेलोटे पद्धतीने चालवले जातात. हिस्सेदारी वाटून घेणे, हा फंडा त्याठिकाणी आहे. जनतेने ही षड्यंत्रे ओळखली पाहिजेत. आपल्या घामातून उभे राहिलेले साखर कारखाने वाचवावेत.

-डॉ. जालंदर पाटील,

प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

---------------------------

राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेऊन एक प्रकारे कर्मयोगीमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराला मूक संमती दिली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५५ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे ‘सक्षम उमेदवार’ नाही म्हणणे म्हणजे पळपुटेपणा आहे. मात्र, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्याठिकाणी गुलाबराव फलफले निवडणूक लढवत आहेत.

- पांडुरंग रायते,

जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

--------------------------------

सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पदकांसाठी भांडणारा सक्षम विरोधक, तसेच संवेदनशील सत्ताधारी असणे गरजेचे असते. दुर्दैवाने अशी माणसे सध्या नाहीत. सत्तेमध्ये कोणीही आले तरी ऊस उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडणारी व्यक्ती हवी आहे. उमेदवार सक्षम आहे का, नाही याचे परीक्षण सभासदांवर सोडले पाहिजे. मात्र, लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायला हव्यात, असे ‘कर्मयोगी’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एका ऊस उत्पादक सभासदाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.