शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

ऊस कारखानदारीमधील साटेलोटे उत्पादकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST

(रविकिरण सासवडे) लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे ऊसपट्टा ढवळून निघू लागला आहे. मात्र, राजकारणाच्या ...

(रविकिरण सासवडे)

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे ऊसपट्टा ढवळून निघू लागला आहे. मात्र, राजकारणाच्या धामधुमीत ऊस उत्पादकांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे. ‘छत्रपती’ कारखान्याच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सक्षम उमेदवार’ नसल्याने अंग काढून घेतले. थोड्याबहुत फरकाने इंदापूर- बारामती तालुक्यातील आगामी साखर कारखाना निवडणुकीत हे चित्र असणार आहे. मात्र, ऊस कारखानदारीमधील हे साटेलोटे ऊस उत्पादकांच्या मुळावर आले आहे. निवडणुका सोडून इतर वेळी होणारा तोंडदेखला विरोध काय कामाचा, अशी भावना सभासदांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

इंदापूर- बारामती तालुक्यांमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. इंदापूरमधील सध्या ‘कर्मयोगी’ व काही दिवसांत ‘छत्रपती’ कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे, तर बारामतीमध्ये ‘सोमेश्वर’च्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. इंदापूर तालुक्यातील बीजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अगदी ठरल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सक्षम उमेदवार’ नसल्याचे कारण देत निवडणुकीतून अंग काढून घेतले. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्र्यांचा पराभव केला. त्या इंदापूर तालुक्यात एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला उमेदवार मिळू नयेत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, तसेच यानंतर होणाऱ्या ‘छत्रपती’ कारखान्याच्या निवडणुकीसाठी केलेले हे साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चादेखील सभासदांमध्ये सुरू झाली आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधील होऊ घातलेल्या एफआरपीच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती वाढत असताना केवळ आधारभूत किमतीसाठी होणारा आग्राह आणि त्याभोवती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेळले जाणारे राजकारण सभासदांना वेड्यात काढण्याचा प्रकार असल्याचेही या विषयातले जाणकार सांगत आहेत. स्थानिक रुसव्याफुगव्यांमध्ये तसेच फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याचीही चर्चा यानिमित्ताने ऊसपट्ट्यात सुरू झाली आहे.

--------------------------------

आम्हाला वाटले म्हणून आम्ही माघार घेतली...

कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीने घेतलेल्या माघारीबाबत माध्यमांनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, ‘तो आमचा प्रश्न आहे. आम्हाला वाटले, आम्ही माघार घेतली. विषय संपला. आमच्यावर कुणाचे काय बंधन आहे का,’ अशा शब्दांत कर्मयोगीच्या निवडणुकीत रस नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले.

------------------------------

महाराष्ट्रातील २०० ते २५० घराणी सातत्याने आलटूनपालटून सत्तास्थानी आली आहेत. अगदी गावगाड्यापासून ते राज्यपातळीपर्यंत या साट्यालोट्याचे संदर्भ नवीन नाहीत. मुळात इंदापूर- बारामती या पट्ट्यामध्ये जे साखर कारखाने आहेत. ते सर्व साटेलोटे पद्धतीने चालवले जातात. हिस्सेदारी वाटून घेणे, हा फंडा त्याठिकाणी आहे. जनतेने ही षड्यंत्रे ओळखली पाहिजेत. आपल्या घामातून उभे राहिलेले साखर कारखाने वाचवावेत.

-डॉ. जालंदर पाटील,

प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

---------------------------

राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेऊन एक प्रकारे कर्मयोगीमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कारभाराला मूक संमती दिली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेसला ५० ते ५५ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे ‘सक्षम उमेदवार’ नाही म्हणणे म्हणजे पळपुटेपणा आहे. मात्र, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्याठिकाणी गुलाबराव फलफले निवडणूक लढवत आहेत.

- पांडुरंग रायते,

जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

--------------------------------

सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पदकांसाठी भांडणारा सक्षम विरोधक, तसेच संवेदनशील सत्ताधारी असणे गरजेचे असते. दुर्दैवाने अशी माणसे सध्या नाहीत. सत्तेमध्ये कोणीही आले तरी ऊस उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडणारी व्यक्ती हवी आहे. उमेदवार सक्षम आहे का, नाही याचे परीक्षण सभासदांवर सोडले पाहिजे. मात्र, लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायला हव्यात, असे ‘कर्मयोगी’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एका ऊस उत्पादक सभासदाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.