शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

खराडी परिसरात धोकादायक रोहित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:53 IST

दोन दिवसांपूर्वी खराडी आयटी पार्क रोडवर झेन्सार कंपनीसमोरील रोहित्राचा स्फोट होऊन दोन आयटी अभियंते भाजले गेले.

- विशाल दरगुडे दोन दिवसांपूर्वी खराडी आयटी पार्क रोडवर झेन्सार कंपनीसमोरील रोहित्राचा स्फोट होऊन दोन आयटी अभियंते भाजले गेले. त्यामध्ये तरुणी प्रियंका झगडे (वय २४, रा. सातारा) २० टक्के भाजली, तर मुलगा पंकज खुणे (वय २६, रा. वर्धा) ६० टक्के भाजला. त्यामुळे धोकादायक रोहित्रांचा प्रश्न समोर आला आहे. वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर परिसरातील सर्व रोहित्रासह डीपींची पाहणी केली असता येथील अनेक रोहित्रे व डीपी धोकादायक आहेत. अनेक रोहित्र व डीपींना आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा स्फोट झाल्यावर उपाययोजना केलेल्या नाहीत. रोहित्र व डीपीच्या बॉक्समध्ये झाडे वाढली असून झाडांच्या फांद्या रोहित्र व डीपीला लागून आहेत. त्यामुळे तिथेही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खराडीतील रोहित्र हे झेन्सार आयटी पार्कचे असून त्या ठिकाणी स्फोटोतील पीडित कामाला होते व ते दोघे पदपथावरून चालत असतानाच अचानक स्फोट झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांचा काहीच दोष नसताना आज ते तरुण व तरुणी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.वडगावशेरी, खराडी, चंदननगर परिसरातील सर्व रोहित्र व डीपींची पाहणी केली, यात असे दिसून आले, की अनेक रोहित्र व डीपीवर व त्यांच्या अवतीभवती मोठी झाडी वाढली आहेत. तसेच रोहित्र असेच उघड्यावर असून त्यांच्या आजूबाजूला जाळी किंवा काही सुरक्षेच्या दुष्टीने काळजी घेण्यात आलेली नाही. खराडी व वडगावशेरीतील अनेक डीपी व रोहित्र वाहतुकीस अडथळा ठरत असून त्याचप्रमाणे ते नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच अनेक रोहित्रे व डीपीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून तो अचानक पेटून स्फोट झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.रोहित्र व डीपीच्या मोठ्या हायटेन्शन केबल ह्या उघड्यावर टाकल्या आहेत. त्याही नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. गेल्या वर्षी टाटा गार्डन येथे नगररस्त्यावर मोठे महावितरणच्या केबलचे जाळे पसरलेले होते ते महावितरणच्या दुर्लक्षामुळे अचानक पेटले व त्यात पंचवीस लाखांच्या केबल दिवसा जळून खाक झाल्या. त्यात महावितरणचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याचे एका महावितरणच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ही घटना घडल्यानंतर जवळपास दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर खराडी, चंदननगर, वडगावशेरीत वीजपुरवठा सुरळीत झाला. दोन दिवस परिसर अंधारात होते. हे काम करण्यासाठी मोठी यंत्रणा झटत होती. मात्र वेळीच सर्व केबल व्यवस्थित ठेवल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती व तब्बल महावितरणचे तीस लाखांचे नुकसान झालेच नसते. हीच परिस्थिती सर्वत्र असून महावितरणच्या अधिकाºयांवर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसून आले आहे. एखादी घटना घडूनही महावितरणचे अधिकारी जर जागे होत नसतील तर ही खूप खेदाची गोष्ट आहे असेच म्हणावे लागेल. अजूनही वडगावशेरी व खराडीसह परिसरातील सर्व रोहित्र व डीपी धोकादायक असून महावितरणचा कारभार अतिशय निष्काळजी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.