शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मांजरी बुद्रुक रस्त्यांची लागली वाट

By admin | Updated: July 6, 2017 03:29 IST

मांजरी बुद्रुक येथील रस्त्याचे काम सुरू आहे. नियोजनाअभावी वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने नागरिकांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमांजरी : मांजरी बुद्रुक येथील रस्त्याचे काम सुरू आहे. नियोजनाअभावी वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मांजरी बुद्रुक घुलेनगर ते गोपाळपट्टी येथील सध्या रस्त्याचे दोन किलोमीटरपर्यंत काम चालू आहे. परंतु रस्त्याचे काम करत असताना निकृष्ट दर्जाचे काम होत असून, भविष्यात पुन्हा याच रस्त्याची व ड्रेनेजलाइनची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता नागरिक करत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असून, ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्या आहेत. दोन्ही पाईपाचा मध्य व्यवस्थित जोडला नसल्याने भविष्यात ड्रेनेज पुन्हा लिकेज होऊन ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. तयार केलेला रस्ता पुन्हा खोदून ड्रेनेजलाईन दुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे होणाऱ्या रस्त्याचा खर्चही वाया जाणार आहे. त्यामुळे वेळीच झालेली चुकीची दुरुस्ती करून भविष्यातील होणारा त्रास व खर्च याला आळा बसेल. पुनावाला ग्रुप सीएसआरच्या माध्यमातून कामाला आर्थिक मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली बाब आहे. रस्ता करण्यासाठी एखादी संस्था मदत करते आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक झालेच पाहिजे; परंतु कंत्राटदाराच्या नियोजनाचा अभाव, रस्त्याचे व ड्रेनेजचे निकृष्ट दर्जाचे काम आणि अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने कामाची पद्धत आणि वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. बांधकाम विभागाचे अभियंता नकुल रणसिंग यांना संपर्क केला असता ते म्हणाले ड्रेनेज लाईनला मध्यभागी जोडणारा जॉईंट हा व्यवस्थित जोडण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना, कामगारांना या ठिकाणी सतत वाहतूककोंडी होत असल्याने वेळेवर पोहोचता येत नाही, रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. अर्धा रस्ता फोडल्यामुळे दोन्हीकडून येणारी वाहतूक एकाच मार्गाने येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. बसगाड्यांना तासन्तास थांबावे लागत आहे. या नकोशा वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांचे रस्त्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यासाठी एकेरी वाहतूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा. तसेच एका बाजूची वाहने गेल्यास दुसऱ्या बाजूची वाहने सोडण्यात यावी, असे केल्यासच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील.