शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळण रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:52 IST

१०१ शेतकऱ्यांचे २३.३९ हेक्टर क्षेत्र झाले संपादित

दावडी : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे बाह्यवळणाचे काम रखडले असून, रुंदीकरणाला सुरुवात झाली. मात्र, काही कामांची गती थंडावली असून, मागील दीड वर्षापासून तर बाह्यवळणाचे कामच ठप्प झाले आहे. अर्धवट स्वरूपात असलेल्या कामामुळे पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर शहरात मोठी वाहतूककोंडी होते. याचा त्रास वाहनचालकांना, नागरिकांना सहन करावा लागत असून, हे बाह्यवळणाचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.राजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे, भांबूरवाडी व राक्षेवाडी या गावांतील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित झाले. बाह्यवळणाबाबत तिढा मिटला असून, जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकºयांना जमिनींचा मोबदला मिळाला आहे. कुठल्याही शेतकºयाची बाह्यवळण शेतजमिनीतून करण्यासाठी हरकत राहिली नाही. बाह्यवळणाचे घोडे कुठे अडले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. या मार्गामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडी सुटून वेळेची तर बचत होणारच आहे. मात्र, अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. चांडोली, होलेवाडी, राक्षेवाडी, टाकळकरवाडी, ढोरे, भांबुरवाडी, झनझनस्थळ या परिसरातून हे बाह्यवळण मार्ग काढण्यात येणार आहे.डोंगरदºया उकरून बाह्यवळणाचे काम करण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी दसºयाच्या दिवशी मोठा गाजावाजा करीत बाह्यवळणाच्या कामाला सुरुवात झाली होती. शेतकºयांच्या उभ्या पिकांतून तसेच झाडे, झुडपे जेसीबी, पोकलँड यंत्राद्वारे उखडून काढण्यात येऊन रस्ता तयार करण्यास सुरुवात केली होती. होणाºया रस्त्याच्या जागेवर दोन्ही बाजूने चर उकरण्यात आले आहेत. मात्र, फक्त चार दिवस काम सुरू होते. त्यानंतर हे काम बंद पडले आहे.खेड घाट ते चांडोली येथील बाह्यवळणाचे नवीन टेंडर काढण्यात आले आहे. त्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे. सध्या काम बंद आहे. ५ ते ६ महिन्यांत बाह्यवळणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.- प्रशांत खोडसकर,प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्गबाह्यवळण करणारा पहिला ठेकेदार पळून गेला. त्यामुळे काम ठप्प आहे. खेडमधील कांदा लसूण केंद्रांचा जागेसंबंधी प्रश्न प्रलंबित आहे. या महामार्गावर नेमलेले १० अधिकारी बदलून गेले, त्याजागी नवीन आले. शेतक ºयांच्या अडचणी आहेत. मी वारंवार संसदेत आवाज उठवून या रस्त्यासाठी पैसे उपलब्ध केले आहेत. अंदाजपत्रक करण्याचे काम सुरू असून, दोन महिन्यांत ते दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन टेंडर निघून कामास सुरुवात होईल.- शिवाजी आढळराव पाटील, (खासदार शिरूर लोकसभा)ज्या शेतकºयांच्या जमिनीतील बाह्यवळणात अडथळा ठरणारी घरे, विहिर, बोअर, झाडे, पाईपलाईन यांचेही मूल्यांकन होऊन याबाबत संबंधित शेतकºयांना नोटिसा बजाविण्यात आल्या.काही शेतकºयांना त्यांचाही मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे बाह्यवळणासाठी कुठलीही अडचण राहिली नाही. हे काम लवकर सुरु करावे अशी मागणी होत आहे.अर्धवट कामामुळे वाहतुक कोंडी नित्याची झाली आहे. महामार्ग ठप्प होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक