शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

नदी सुधारणेची ऐसीतैशी : स्मार्ट योजना कागदावर, कृती शून्य; पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 05:09 IST

नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

पुणे : नदी सुधारणेसाठी हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणार असलेल्या जायका प्रकल्पाला मंजुरी मिळून दोन वर्षे उलटली, तरी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्याच वेळी नदी स्वच्छतेसाठी पूर्वापार अवलंबल्या जाणाºया छोट्या मात्र महत्त्वाच्या बाबींकडेही पालिकेकडून मोठ्या प्रमाणातदुर्लक्ष होत आहे. शहरातीलपुलांवर तसेच नदीपात्राच्या बाजूने ठेवण्यात आलेले निर्माल्य कलश गायब झाले असून, त्याकडे लक्ष देण्यात पालिका प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही.शहरात सध्या नवरात्रोत्सवाची धूमधाम सुरू आहे. उत्सवाच्या काळात घराघरातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. निर्माल्य संकलित करण्यासाठी पालिकेकडून शहरात ठिकठिकाणी कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अचानक हे कलश गायब झाल्याने शहरात दररोज संकलित होणारे शेकडो टन निर्माल्य थेट नदीमध्ये पडू लागले आहे. त्याचबरोबर काही जणांकडून ते नदीत न टाकता ते पुलावरच पूर्वी ठेवण्यात आलेल्या कलशांच्या जागेवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे तिथे निर्माल्यांचे ढीग साचू लागले आहेत.प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले हे निर्माल्य इतरत्र पसरू लागले आहे. ‘निर्माल्य इथे ठेवण्यात आलेल्या कलशामध्ये टाकावे,’ असे आवाहन करणारे फलक पालिकेने लावले होते. परंतु, फलकच आता कलशाची वाट पाहू लागले आहेत. नदीसुधारणेसाठी मोठे प्रकल्प राबविण्याच्या निव्वळ घोषणा करण्याऐवजी या छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.नागरिकांनी कलशात टाकलेल्या निर्माल्याचा वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी केला जाईल, असे स्पष्ट करून ते संकलित करण्यासाठी पूर्वी पालिकेकडून सातत्याने प्रयत्न होत होते. शाळा, महाविद्यालयांमधून जनजागृती करण्यात आली. परिणामी नागरिकांना निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाकण्याचे महत्त्व पटू लागले होते. निर्माल्य कलश ओसंडून वाहत होते. मात्र अचानक ठिकठिकाणचे निर्माल्य कलश गायब झाले आहेत. नागरिकांमध्ये निर्माण झालेली स्वयंशिस्तीला पालिकेच्या हलगर्जीपणामुळे बाधा येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडूनच हे कलश हलविण्यात आले की परस्पर कोणी उचलून नेले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिकेकडून दरवर्षी कलशामध्ये संकलित होणारे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविण्याच्या व्यवस्थेसाठी विशिष्ट आर्थिक तरतूद करण्यात येते. तरीही निर्माल्य कलशांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका