शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गॅसच्या किंमती वाढल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:10 IST

वाल्हे : दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त ...

वाल्हे : दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्वला याेजनेंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र गत काही महिन्यात गॅसचे भाव गगणाला भिडल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने, उज्वला याेजनेचे लाभार्थी व इतर गॅस धारक पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आता गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. मात्र, चूल पेटविण्यासाठी राॅकेल मिळत नसल्याने विस्तव पेटविण्यासाठी महिलांच्या डाेळ्यांतून अश्रू बाहेर पडत आहेत. ग्रामीण भागातील ९० टक्के कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत हाेते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे आजार हाेतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक 'बजेट"कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिली आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वनवन भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या हेतुने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, दरात हाेत असलेलेल वाढ लाभार्थीसाठी डोकेदुखी ठरत आहे. सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर. उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे.

--

चौकट

जुलै ते फेब्रवारी दरम्यान २२८ रुपयांनी वाढले दर

गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचला. त्यानंतर महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ५०, तर मार्च २०२१ मध्येही गॅस सिलेंडरची भाववाढ होऊन सिलेंडर ८२७ रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे गृहीनी म्हणतात चुलीवरच स्वयंपाक बरा.

--

"उज्वला याेजनेंतर्गंत आम्हाला दोन वर्षांपूर्वी गॅस कनेक्शन माेफत मिळाले. उज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने आनंद झाला होता. मात्र, महागडा गॅस वापरणे परवडत नाही. आम्ही दिवसभर उन्हातान्हात राबल्यावर १५० रूपये मिळतात त्यात सिलेंडरसाठी ८०० रूपये खर्च करायचे तर आम्ही मग खायचं काय ? त्यामुळे आपली बिन खर्चिक चुल बरी.

-सिंदूबाई रोकडे, गृहिणी वाल्हे.

--

कोरोना आल्यापासून, सगळ्याच वस्तू महाग झाल्यात. कोरोना यायच्या आधी तेलाचा पुडा ७५ रूपयाला मिळायचा, आता मिळतोय, १४४ रूपायाला. गॅस सिलिंडर मिळत होता, ५०० रुपयाला, सरकारने आधी सिलेंडर कनेक्शन फुकट वाटले आणि सिलेंडर खूप महाग केला त्यामुळे घरातील खर्च भागवितांना नाकीनऊ येत आहे. त्यात आता गॅस महाग झाल्यामुळे आम्ही आता सिलेंडर भरून आणला नाही. आता चुलीवर स्वयंपाक करतोय.

- वैशाली दुर्गाडे, गहिणी कामठवाडी.

--

चौकट -

९७० गॅस धारकांकडून सिलेंडर रिफिलींग नाही

केंद्र सरकारच्या 'उज्वला याेजनेंतर्गंत' मागील दोन-तीन वर्षामध्ये वाल्हे (ता.पुरंदर) येथील यशोधन गॅस एजन्सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत, २५३९ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन माेफत देण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत २५३९ गॅस कनेक्शन लाभार्थी असले तरी, यामधील ९७० उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी सिलेंडर महागाई व इतर काही कारणाणे गॅस सिलेंडर भरून नेत नाहीत. दिवसेंदिवस गॅस सिलेंडरची महागाई वाढत चालल्याने गॅस विक्रीवरही यांचा परिणाम मागील काही महिन्यांपासून होत असल्याची माहिती यशोधन गॅस एजन्सीच्या संचालिका आश्विनी वाघोले यांनी दिली.

--

फोटो क्रमांक : २० वाल्हे सिलेंडर

. फोटोओळ - वाल्हे (ता.पुरंदर) ग्रामीण भागात रानात काबाड क महिला स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्याने, चुलीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.