शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 04:25 IST

साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला.

पुणे : साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला. त्यामुळे प्रकाशनाचे हक्क पुन्हा एकदा कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडे आले आहेत. स्वामित्वअधिकार समाप्तीपर्यंत हे अधिकार प्रकाशनाकडे कायम राहणार आहेत.कॉन्टिनेंटल प्रकाशनाने शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या. मात्र, सावंत कुटुंबियांनी या तिन्ही साहित्यकृतींचे हक्क मेहता प्रकाशनाला दिले होते. यावर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागितली. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद मंडळाची नियुक्ती केली होती. लवाद मंडळाने पावणेचार वर्षांनंतर निकाल दिला. निर्णयानुसार, कॉन्टिनेंटल प्रकाशनाखेरीज अन्य लेखक अथवा प्रकाशकास हे साहित्य प्रकाशित किंवा वितरीत करता येणार नाही. कॉन्टिनेंटलने प्रकाशित केलेले शिवाजी सावंत यांचे साहित्य सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार तसे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर आणि ॠतुपर्ण कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी