शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘मृत्युंजय’कारांच्या साहित्याचे हक्क पुन्हा कॉन्टिनेंटलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 04:25 IST

साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला.

पुणे : साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या शिवाजी सावंत लिखित ‘मृत्यूंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या साहित्यकृतींच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या लवाद मंडळाने काँन्टिनेंटलच्या बाजूने गुरुवारी अंतिम निर्णय दिला. त्यामुळे प्रकाशनाचे हक्क पुन्हा एकदा कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडे आले आहेत. स्वामित्वअधिकार समाप्तीपर्यंत हे अधिकार प्रकाशनाकडे कायम राहणार आहेत.कॉन्टिनेंटल प्रकाशनाने शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या. मात्र, सावंत कुटुंबियांनी या तिन्ही साहित्यकृतींचे हक्क मेहता प्रकाशनाला दिले होते. यावर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे दाद मागितली. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद मंडळाची नियुक्ती केली होती. लवाद मंडळाने पावणेचार वर्षांनंतर निकाल दिला. निर्णयानुसार, कॉन्टिनेंटल प्रकाशनाखेरीज अन्य लेखक अथवा प्रकाशकास हे साहित्य प्रकाशित किंवा वितरीत करता येणार नाही. कॉन्टिनेंटलने प्रकाशित केलेले शिवाजी सावंत यांचे साहित्य सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार तसे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर आणि ॠतुपर्ण कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी