शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: April 23, 2015 06:36 IST

उन्हाची दाहकता वाढल्याने परिसरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा उठवत टॅँकर लॉबीचा धंदा जोमात सुरू असून, धंदा तेजीत चालण्यासाठी पाणीपुरवठ्याची त्यांनाच

अंकुश जगताप, पिंपरीउन्हाची दाहकता वाढल्याने परिसरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा उठवत टॅँकर लॉबीचा धंदा जोमात सुरू असून, धंदा तेजीत चालण्यासाठी पाणीपुरवठ्याची त्यांनाच अधिक काळजी असल्याचा आव ते आणत आहेत. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती उभ्या करण्यासाठी महापालिकेच्या तसेच खासगी जलस्रोतांद्वारे बेसुमार पाणीवापर सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याने हे सर्व प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. पाऊस लांबल्यास शहराला पुन्हा पाणीटंचाईच्या खाईत लोटण्याचा कारभार पाणीपुरवठा विभागाकडून सध्या सुरू आहे. शहराची लोकसंख्या १८ लाखांवर आहे. त्यातच नव्याने स्थलांतरित झालेल्यांचा विचार करता हेच प्रमाण २० लाखांवर आहे. अनेक जणांकडे अधिकृत नळजोड नाहीत. बांधकाम व्यवसायासाठी वेगळ्या व्यावसायिक दराने पाणी पुरविण्याची व्यवस्था नाही. यासह अनेक जणांकडे अद्यापही पाणीवितरणाचे मीटर नाही. ठराविक भागात अद्यापही मोटार लावून पाणी खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. या सर्वांकडून सध्या पाण्याची भरमसाट मागणी असून, शक्य तेथे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. यासह घरगुती कार्यक्रम असल्यास जादा पाण्याची अनेक कुटुंबीयांना गरज भासते. ती भागविण्यासाठी सध्या टॅँकर लॉबी सक्रिय झाली आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून ७ मुख्य वाहिन्यांद्वारे शहरभरातील ८५ टाक्यांमध्ये प्रक्रिया केलेले पाणी पोहोचविले जाते. या टाक्यांपैकी रहाटणी ‘ड’ प्रभागाजवळ, पिंपळे सौदागर गावठाण, तळवडे, चिंचवड आदी ठिकाणी टाक्यांमधील पाणी टॅँकरमध्ये भरून विकण्याचा धंदा केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये हद्दीबाहेर टॅँकर व्यावसायिकांना होणारी पाणी विक्री, या पाणीवितरणात व फेऱ्यांच्या नोंदीमध्ये असणारी अनागोंदीचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर हद्दीबाहेर टॅँकरने पाणी विक्री होण्यास आळा बसला आहे. मात्र अद्यापही शहरात सार्वजनिक तसेच, खासगी जलस्रोतांद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. महापालिकेने एकीकडे मीटर पद्धत सुरू केली आहे. अशा स्थितीत शहरात इतर व्यावसायिकांसाठी पाणीवापराबाबत ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात कोठेही जलवाहिनी दुरुस्ती अथवा पाणीवितरणात बिघाड झाल्यावरच नागरिकांना टॅँकरने पाणी पुरविले जाण्याची वेळ येत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी टेंडर पद्धतीने टॅँकर व्यावसायिकांना ठेका देण्यात आला आहे. यासह खासगी टॅँकर व्यावसायिकांकडून जलकुंभांवरून पाण्याची मागणी झाल्यास त्यांना दहा हजार लिटरच्या टॅँकरसाठी ३०० रुपयांचे चलन भरावे लागते. मात्र या चलनापोटी किती रक्कम जमा होत आहे, किती टॅँकर पाणी वितरण झाले आहे याची माहिती देण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्सर चालढकल केली जात आहे.