शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: April 23, 2015 06:36 IST

उन्हाची दाहकता वाढल्याने परिसरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा उठवत टॅँकर लॉबीचा धंदा जोमात सुरू असून, धंदा तेजीत चालण्यासाठी पाणीपुरवठ्याची त्यांनाच

अंकुश जगताप, पिंपरीउन्हाची दाहकता वाढल्याने परिसरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. याचा फायदा उठवत टॅँकर लॉबीचा धंदा जोमात सुरू असून, धंदा तेजीत चालण्यासाठी पाणीपुरवठ्याची त्यांनाच अधिक काळजी असल्याचा आव ते आणत आहेत. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती उभ्या करण्यासाठी महापालिकेच्या तसेच खासगी जलस्रोतांद्वारे बेसुमार पाणीवापर सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याने हे सर्व प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. पाऊस लांबल्यास शहराला पुन्हा पाणीटंचाईच्या खाईत लोटण्याचा कारभार पाणीपुरवठा विभागाकडून सध्या सुरू आहे. शहराची लोकसंख्या १८ लाखांवर आहे. त्यातच नव्याने स्थलांतरित झालेल्यांचा विचार करता हेच प्रमाण २० लाखांवर आहे. अनेक जणांकडे अधिकृत नळजोड नाहीत. बांधकाम व्यवसायासाठी वेगळ्या व्यावसायिक दराने पाणी पुरविण्याची व्यवस्था नाही. यासह अनेक जणांकडे अद्यापही पाणीवितरणाचे मीटर नाही. ठराविक भागात अद्यापही मोटार लावून पाणी खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. या सर्वांकडून सध्या पाण्याची भरमसाट मागणी असून, शक्य तेथे महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. यासह घरगुती कार्यक्रम असल्यास जादा पाण्याची अनेक कुटुंबीयांना गरज भासते. ती भागविण्यासाठी सध्या टॅँकर लॉबी सक्रिय झाली आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्रापासून ७ मुख्य वाहिन्यांद्वारे शहरभरातील ८५ टाक्यांमध्ये प्रक्रिया केलेले पाणी पोहोचविले जाते. या टाक्यांपैकी रहाटणी ‘ड’ प्रभागाजवळ, पिंपळे सौदागर गावठाण, तळवडे, चिंचवड आदी ठिकाणी टाक्यांमधील पाणी टॅँकरमध्ये भरून विकण्याचा धंदा केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये हद्दीबाहेर टॅँकर व्यावसायिकांना होणारी पाणी विक्री, या पाणीवितरणात व फेऱ्यांच्या नोंदीमध्ये असणारी अनागोंदीचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर हद्दीबाहेर टॅँकरने पाणी विक्री होण्यास आळा बसला आहे. मात्र अद्यापही शहरात सार्वजनिक तसेच, खासगी जलस्रोतांद्वारे पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. महापालिकेने एकीकडे मीटर पद्धत सुरू केली आहे. अशा स्थितीत शहरात इतर व्यावसायिकांसाठी पाणीवापराबाबत ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात कोठेही जलवाहिनी दुरुस्ती अथवा पाणीवितरणात बिघाड झाल्यावरच नागरिकांना टॅँकरने पाणी पुरविले जाण्याची वेळ येत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी टेंडर पद्धतीने टॅँकर व्यावसायिकांना ठेका देण्यात आला आहे. यासह खासगी टॅँकर व्यावसायिकांकडून जलकुंभांवरून पाण्याची मागणी झाल्यास त्यांना दहा हजार लिटरच्या टॅँकरसाठी ३०० रुपयांचे चलन भरावे लागते. मात्र या चलनापोटी किती रक्कम जमा होत आहे, किती टॅँकर पाणी वितरण झाले आहे याची माहिती देण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्सर चालढकल केली जात आहे.