शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

इंग्लंडच्या ६ तरुणांची कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:41 IST

लंडन येथील हे ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्यांच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षकण व शांतीचा संदेश देत आहेत. २० ते २५ दिवस केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या  पाच राज्यांमधून विविध संस्कृतींचा अभ्यास व चित्रीकरण ते करत आहेत. 

ठळक मुद्देस्वराज्याची राजधानी राजगडला भेट : भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास कोची ते जैसलमेर दरम्यान रिक्षा दौडचे आयोजन भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘जग्वार’ या वन्य प्राण्याचा संवर्धन होण्यासाठी जागृती मोहीम

वेल्हे : पृथ्वीवरील वनसंपत्ती आणि पर्यावरणरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी आणि विश्वबंधुत्व, ऐक्य व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासारखी लंडन येथील ६ ध्येयवेड्या तरुणांनी भारतातील कोची ते जैसलमेर या दरम्यान रिक्षा दौडचे आयोजन केले आहे. हे ध्येयवेडे तरुण १८ दिवस ५ राज्यांच्या सीमा पार करत येथील शहरी व ग्रामीण भाग आणि जंगल प्रदेशातून प्रवास करत वनसंरक्षकण व शांतीचा संदेश देत आहेत. २० ते २५ दिवस केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पाच राज्यांमधून विविध संस्कृतींचा अभ्यास व चित्रीकरण ते करत आहेत. वेल्हे तालुक्यातील स्वराज्याची राजधानी राजगड किल्ल्याला त्यांनी भेट दिली. यावेळी लोकमत प्रतिनिधीशी  त्यांची बातचीत झाली. जेत्रो क्रोक, बेल फ्यारी, सयाम स्नोड, रुफ्फ रेज्जास, जेस्स्य फ्योबेर्स, लेम पुलं हे लंडनमधील ६ युवक अनोख्या रिक्षा दौडमध्ये सहभागी झाले आहेत. या प्रवासात कोची ते जैसलमेर असा ३ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास वीस दिवसांत पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या मोहिमेतून हे निसर्गप्रेमी परदेशी युवक भारतीय संस्कृती व पश्चिम घाटातील नैसर्गिक विविधतेचा अभ्यास करत आहेत. भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘जग्वार’ या वन्य प्राण्याचा संवर्धन होण्यासाठी जागृती मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. 

ब्रिटनमधील राजधानी लंडन येथील हे सहाही तरुण उच्चशिक्षित आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधता, सह्याद्री पर्वतरांग, निसर्गसौंदर्य यांचा अभ्यास करण्यासाठी व आस्वाद घेण्यासाठी वनजंगल वाचविण्यासाठी रिक्षादौड मोहीम केरळमधील कोची येथून सुरू केली. तसेच विश्वशांतीचा व बंधुत्वाचा संदेश या रिक्षा दौडमधून ते देत आहेत. हा लांब पल्ल्याचा प्रवास दोन रिक्षांमधून ते करत असून, रिक्षांच्या वर दुर्मिळ ह्यजग्वारह्ण प्राण्याची बसवलेली प्रतिकृती सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.वीस दिवसांत भारतीय ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अंधार पडेल त्या खेडेगावात मुक्काम करणे, गावामधील ग्रामीण जेवण करणे, नदीवर अंघोळ असा नैसर्गिक प्रवास ते करत आहेत. 

.........................

भारतालील लोक अतिशय प्रेमळ असून यांना भेटून आम्हांला खूप आनंद झाला. येथील विविधतेतील एकता आणि वैविध्यपूर्ण संस्कृती आम्हांला खूप आवडली. जागोजागी नागरिकांकडून सहकार्य व प्रेम मिळते याचे आम्हांला खूप आश्चर्य वाटते. भारत देश अतिशय निसर्गसंपन्न असून येथील निसर्ग आणि वन्यजीव टिकवण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रातील वेल्हे तालुक्यातील शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला आम्हांला खूप आवडला. या किल्ल्याची जागतिक वारसास्थळात नोंद असल्याने आम्ही तो आवर्जून पाहिला.    बेल फ्यारी, लंडन पर्यटक, रिक्षा दौड. 

टॅग्स :PuneपुणेEnglandइंग्लंडJaguarजॅग्वार